शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:13 IST

कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे.

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे. या टाकीची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पाहणी केली आहे, या वेळी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.शासनाच्या १०० टक्के अनुदानातून कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर केले होते. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केले. त्यानंतर ही पाणी योजना प्राधिकरणाने नगरपरिषदेच्या ताब्यात दिली. मात्र, योजनेच्या कामात अनेक त्रुटी असताना उद्घाटनाच्या हट्टापायी त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी ही योजना ताब्यात घेतली, त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला आज पाणीपुरवठा योजनेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नगरपरिषद क्षेत्रातील आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी एक लाख ८० हजार लीटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला काही वर्षांनंतर गळती लागली होती, नगपरिषद प्रशासनाने या टाकीची गळती काढण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले होते. मात्र, आता या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने या परिसरातील नागरिकांची नेहमीच तक्रार असे आणि गळतीमुळे पाणी वाया जात असे. या गळक्या टाकीची पाहणी शुक्रवारी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली. या वेळी त्यांच्या समवेत स्थानिक नगरसेविका प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, जल अभियंता अशोक भालेराव, नीलेश चौडीए, सुदाम म्हसे, पाणी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.या टाकीची गळती काढण्याचे काम सुरू केल्यावर या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल किंवा या परिसरात नवीन टाकी बांधावी लागल्यास त्यासाठी नवीन जागा शोधावी लागेल, या वेळी याच परिसरात दोन जागेची पाहणीसुद्धा करण्यात आली. याबाबत सभेमध्ये लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षा जोशी यांनी सांगितले.