शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

महाविकास आघाडीचे नेते पुढारी प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात - आ.महेश बालदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 16:18 IST

आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवाद सभेतून महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली.

मधुकर ठाकूर 

उरण : महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी कडवट टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांची सभा उरणमध्ये पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच स्टेजवर बारणे यांच्या प्रचारासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या जनसंवाद सभेतून महाविकास आघाडीचे नेते, पुढारी मावळमध्ये प्रचारासाठी नव्हे तर पर्यटनासाठी येतात अशी कडवट टीका भाजप आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये आयोजित जनसंवाद सभेतून केली. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपावरून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेश बालदी यांनी  शेतकऱ्यांना खोटी इरादा पत्र देऊन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप उरणच्या प्रचारसभेतुन केला होता.

आमदार जयंत पाटील यांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या आमदार महेश बालदी यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची शेकाप पर्यायाने जयंत पाटलांनीच फसवणूक केली असल्याचा आरोप करून प्रत्युत्तर दिले.फसवणूक केल्यानेच तुम्हाला लोकांनी घरी बसवले.त्यामुळे अलिबागमधील एकही जागा निवडून आणू शकलेले आमदार जयंत पाटील उगाच गावच्या पाटीलकी करीत सांगोला, सांगलीत प्रचारासाठी फिरताना दिसतात.जयंत पाटील साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपाबाबत मी खोटे बोलत असेन तर मी राजकारण सोडायला तयार आहे.तुम्ही काय सोडणार ते सांगा असे प्रती आव्हान आमदार बादली यांनी दिले.शेकापचे दुसरे माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बॅकेत केलेल्या ५४८ घोटाळा प्रकरणी तीन वर्षांपासून जेलमध्ये बसले आहेत.

करंजा मच्छीमार बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी आलेल्या आमदारांनी ही आयडिया माझीच असल्याचे सांगितले.या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेताना आमदार महेश बालदी यांनी नुसती आयडिया असुन उपयोगाचे नाही.तर खिशात पैसेही असावे लागतात. केंद्र,राज्य सरकारच्या मदतीने १५० क़ोटी रुपये खर्चून हे बंदर उभारण्यात आले आहे.अतिरिक्त आवश्यक  खर्चाच्या रकमेचीही लवकरच करून येत्या चार महिन्यांत या करंजा मच्छीमार बंदराचे काम पूर्ण केले जाईल असा दावाही बालदी यांनी केला.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभासाठी येथील आमदारांना आमंत्रित करण्यात आले आले होते.मात्र स्टेज शेअर करण्याऐवजी हे आमदार महाशय दिड किमी अंतरावर निषेधाचे काळे झेंडे दाखवत आंदोलन करीत राहिले.मग नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठेकेदारीची कामे नाकारण्याऐवजी करण्यातच आघाडीवर होते. मग ठेकेदारीची कामे घेताना, करताना काहीच कसे वाटले नाही अशी घणाघाती टीकाही आमदार महेश बालदी यांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड,  भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४