शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

उन्हाच्या काहिलीने पक्ष्यांची दाणा-पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:30 IST

तापमानाचा पारा वाढल्याने सारेच त्रस्त

विनोद भोईरलोकमत न्यूज नेटवर्कपाली : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्ष्यांना जास्त बसत आहे. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी पक्षी मानवी वस्तीतदेखील येत आहेत. भूक-आणि पाण्यावाचून तसेच यातून येणाऱ्या तणावातून पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विळे पाटणूस भागात नुकत्याच अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. पाण्यासाठी वणवण फिरत असताना पिवळ्या डोळ्याचा सातभाई नावाचा पक्षी भरदुपारी वाहनांच्या धडकेने जखमी झालेला अभ्यासक राम मुंढे यांना आढळला. त्यानंतर हा पक्षी दगावला. त्याचदिवशी भीरा येथील संकेत देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात घारीचे एक मोठे पिलू निपचित बसले होते. त्यांनी मुंढे यांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे या पिलाच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि त्या पिलाला त्रास होऊ लागल्यामुळे ते अंगणात येऊन बसले होते, असे मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर देवरुखकर यांनी त्या पिलाच्या अंगावर पाणी टाकले, तसे ते थोडे सावध झाले आणि उठून समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसले आणि आपल्या पंखांना पसरवून ते हालचाल करू लागले. 

पाणी पिऊन तासाभराने तेथून निघून गेले. यासंदर्भात राम मुंढे यांनी माणगाव वनविभागाशीदेखील संपर्क केला. आपल्या भागात अशा घटना घडत असतील, तर माणगाव वनविभाग यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन वनरक्षक अमोल निकम यांनी दिले.

ऊन वाढू लागल्याने पशु-पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी भटकंती वाढते. तसेच सावलीचीदेखील आवश्यकता लागते. हे मिळविण्याच्या खटाटोपात पक्षी तणावात (स्ट्रेस) जातात आणि त्यांचा मृत्यू होेतो. लोकांनी आपल्या घराच्या छपरावर, अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची व दाण्याची थोडी व्यवस्था केली, तरी या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. तसेच जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाण्याचे स्रोत व पाणवठयामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.    - डॉ. प्रशांत कोकरे,    पशुधन विकास अधिकारी, सुधागड

सध्या घारीची पिलं घरट्यातून बाहेर पडतात. आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात त्यांचे घरट्याच्या बाहेर पडणे त्यामुळे ते विचलित होतात आणि अशातच या पिलाला उन्हाचा त्रास व पाणी न मिळाल्याने ते जास्त बिथरले होते. असेच इतरही पक्ष्यांच्या बाबतीत घडते.- राम मुंढे

पाटणूस येथे देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात अन्न-पाण्याच्या शोधात आलेली घार. (छाया : विनोद भोईर)

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड