शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:46 IST

सहा लेनचे दोन बोगदे; २०२०पर्यंत काम पूर्ण होणार

जयंत धुळप ।अलिबाग : रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मे महिन्यात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सन २०२०पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली आहे. त्यामुळे हा घाट पार करण्यासाठी लागणाºया ४० मिनिटांचा कालावधी अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे.रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा दुवा असणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला रत्नागिरीची जिल्हाधिकारी प्रदीप पी., राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी अमित शेडगे, खेडचे प्रांताधिकारी सोनावणे आणि कशेडी घाटाचे काम करणारे कंत्राटदारही उपस्थित होते.कशेडी घाटातील अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच कशेडी घाटाचे ३४ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तसेच गोवा महामार्गाने कोकणात जाणाºया प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी कशेडी घाटातील बोगदा महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित अधिकाºयांसोबत अनेक बैठका घेतल्या. केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहारही केला. त्यानुसार केंद्राच्या रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी मंजूर केले आहेत.मे महिन्यापासून या बोगद्याचे पाथमुख उघडण्याचे काम सुरू होईल. भोगांवपासून या कामास सुरुवात करण्यात येईल. कशेडी येथे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार असून, जाण्यासाठी व येण्यासाठी प्रत्येकी तीन लेन ठेवण्यात येणार आहे. तसेच बोगद्यामध्ये लाइटची तसेच व्हेंटिलेशन व्यवस्था, बोगद्यात गाडीत बिघाड झाल्यास गाडी बाजूला उभी करण्यासाठी विशेष व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच साईन बोर्डही लावण्यात येणार आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावरही त्या रस्त्याच्या देखभालीचे काम चार वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र