शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

उन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:52 IST

सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे.

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहीर) पूर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होत असून, धरण रिते झाले आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील दुरुस्तीची कामे संबंधितांनी करावी, अशी मागणी होत आहे.लघू पाटबंधारे विभागामार्फत १९७२ मध्ये उन्हेरे धरणाचे बांधकाम झाले. धरणाचे सिंचन क्षेत्र १४२ हेक्टर आहे. मात्र, ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती झाली त्या सिंचनासाठी पाण्याचा वापर होत नाही. मागील अडीच वर्षांपूर्वी जॅकवेल मोडकळीस आली होती. त्यामुळे धरणातून पाणी वाया जात होते. त्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी करुन लवकरच विहीर व गेटची दुरु स्ती करणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग कोलाड यांनी सांगितले होते. मात्र, आजतागायत यासंदर्भात कोणतीच उपाययोजना झाली नाही. सध्या ही जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.>बेकायदा रेती उत्खननावर कारवाईहे धरण कोरडे होत असल्यामुळे येथे रेतीमाफिया सक्रिय झाले होते. मात्र, उन्हेरे धरण क्षेत्रातील बेकायदा रेती उत्खननावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. सहा ब्रास रेती जप्त केली असून धरण क्षेत्रात जाणारा रस्ता वाहनांकरिता पूर्णपणे बंद केला आहे, त्यामुळे येथील रेती उत्खनन आता बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले. मात्र, इतरही अडचणी लक्षात घेऊन येथे योग्य त्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी करीत आहे.तर येत्या काही दिवसांत येथे रेती उत्खननाबाबतची अधिक कारवाई देखील नियोजित असल्याचे तहसीलदार दिलीप रैनावार यांनी सांगितले.>हे केल्यास होईल फायदाधरणाची व कालव्याची दुरु स्ती केल्यास सभोवतालचा परिसर सिंचनाखाली येऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरातील शेतीला, नद्यांना व विहिरींना मुबलक पाणी मिळेल. गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल.>धरण क्षेत्रातील समस्याधरणाची जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.धरणातील पाणीगळती लागून बाहेर वाया जात आहे.धरणाच्या बांधांवर झाडी वाढली आहे.धरण मद्यपींचा अड्डा बनले आहे.धरण गाळाने भरले आहे.>डिझाईन डिव्हिजनकडून डिझाईन मिळाले नव्हते त्यामुळे धरणाचे काम करता येत नव्हते. आता ते डिझाईन मिळाले आहे. त्यामुळे निविदा मागविण्यासाठीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. धरणाच्या दुरु स्ती कामाची निविदा मागविली जाणार आहे. त्यानंतर धरणाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले जाईल.- आर. के. सुपे, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग कोलाड.अधिकाधिक लोकांनी सिंचनासाठी पाणी वापरणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची वेळीच दुरु स्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा आमच्या पंचक्र ोशीला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.- शिवमूर्ती पवार,पोलीस पाटील, उन्हेरे