शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

उन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:52 IST

सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे.

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहीर) पूर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होत असून, धरण रिते झाले आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील दुरुस्तीची कामे संबंधितांनी करावी, अशी मागणी होत आहे.लघू पाटबंधारे विभागामार्फत १९७२ मध्ये उन्हेरे धरणाचे बांधकाम झाले. धरणाचे सिंचन क्षेत्र १४२ हेक्टर आहे. मात्र, ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती झाली त्या सिंचनासाठी पाण्याचा वापर होत नाही. मागील अडीच वर्षांपूर्वी जॅकवेल मोडकळीस आली होती. त्यामुळे धरणातून पाणी वाया जात होते. त्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी करुन लवकरच विहीर व गेटची दुरु स्ती करणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग कोलाड यांनी सांगितले होते. मात्र, आजतागायत यासंदर्भात कोणतीच उपाययोजना झाली नाही. सध्या ही जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.>बेकायदा रेती उत्खननावर कारवाईहे धरण कोरडे होत असल्यामुळे येथे रेतीमाफिया सक्रिय झाले होते. मात्र, उन्हेरे धरण क्षेत्रातील बेकायदा रेती उत्खननावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. सहा ब्रास रेती जप्त केली असून धरण क्षेत्रात जाणारा रस्ता वाहनांकरिता पूर्णपणे बंद केला आहे, त्यामुळे येथील रेती उत्खनन आता बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले. मात्र, इतरही अडचणी लक्षात घेऊन येथे योग्य त्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी करीत आहे.तर येत्या काही दिवसांत येथे रेती उत्खननाबाबतची अधिक कारवाई देखील नियोजित असल्याचे तहसीलदार दिलीप रैनावार यांनी सांगितले.>हे केल्यास होईल फायदाधरणाची व कालव्याची दुरु स्ती केल्यास सभोवतालचा परिसर सिंचनाखाली येऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरातील शेतीला, नद्यांना व विहिरींना मुबलक पाणी मिळेल. गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल.>धरण क्षेत्रातील समस्याधरणाची जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.धरणातील पाणीगळती लागून बाहेर वाया जात आहे.धरणाच्या बांधांवर झाडी वाढली आहे.धरण मद्यपींचा अड्डा बनले आहे.धरण गाळाने भरले आहे.>डिझाईन डिव्हिजनकडून डिझाईन मिळाले नव्हते त्यामुळे धरणाचे काम करता येत नव्हते. आता ते डिझाईन मिळाले आहे. त्यामुळे निविदा मागविण्यासाठीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. धरणाच्या दुरु स्ती कामाची निविदा मागविली जाणार आहे. त्यानंतर धरणाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले जाईल.- आर. के. सुपे, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग कोलाड.अधिकाधिक लोकांनी सिंचनासाठी पाणी वापरणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची वेळीच दुरु स्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा आमच्या पंचक्र ोशीला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.- शिवमूर्ती पवार,पोलीस पाटील, उन्हेरे