शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

वाळीत टाकलेल्या 80 कुटुंबांना न्याय मिळणार, खटल्यात आज शेवटचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:23 IST

आज सुनावणी : अंतिम युक्तिवादापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील पहिलाच खटला

अलिबाग : आगरी समाजातील जातपंचायतीने शहाबाज येथील ८० कुटुंबीयांना वाळीत टाकले होते़ या प्रकरणी स्थानिक जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे़ अंतिम युक्तिवादाच्या स्तरापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच खटला असल्याने या खटल्यातील निकालावर राज्यातील इतर अनेक वाळीत टाकलेल्या लोकांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांच्या समोर ८० वाळीतग्रस्त कुटुंबांच्या वतीने अ‍ॅड. सरोदे यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. तर आता सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतील व त्यावर अ‍ॅड. सरोदे यांचा प्रतिवाद होऊन नंतर या प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे़या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना अ‍ॅड. सरोदे म्हणाले, २०१३ मध्ये कमळपाडा वस्तीतील मधुकर पाटील (फिर्यादी) यांच्यासह ८० कुटुंबांना वाळीत टाकल्यामुळे जातपंचायतीतील सदस्यांविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जातीतून वाळीत टाकणे, समाजात असंतोष आणि द्वेष पसरवणे, गुन्हेगारी प्रकारचा कट रचून तेढ निर्माण करणे, अन्यायग्रस्तांना धमक्या देणे तसेच त्यांना मानसिक व शारीरिक इजा व संपत्ती नष्ट करण्याची धमकी देणे, अशा कलमांनुसार ११ आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

टॅग्स :Courtन्यायालयRaigadरायगडalibaugअलिबाग