शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाळीत टाकलेल्या 80 कुटुंबांना न्याय मिळणार, खटल्यात आज शेवटचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:23 IST

आज सुनावणी : अंतिम युक्तिवादापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील पहिलाच खटला

अलिबाग : आगरी समाजातील जातपंचायतीने शहाबाज येथील ८० कुटुंबीयांना वाळीत टाकले होते़ या प्रकरणी स्थानिक जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे़ अंतिम युक्तिवादाच्या स्तरापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच खटला असल्याने या खटल्यातील निकालावर राज्यातील इतर अनेक वाळीत टाकलेल्या लोकांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांच्या समोर ८० वाळीतग्रस्त कुटुंबांच्या वतीने अ‍ॅड. सरोदे यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. तर आता सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतील व त्यावर अ‍ॅड. सरोदे यांचा प्रतिवाद होऊन नंतर या प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे़या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना अ‍ॅड. सरोदे म्हणाले, २०१३ मध्ये कमळपाडा वस्तीतील मधुकर पाटील (फिर्यादी) यांच्यासह ८० कुटुंबांना वाळीत टाकल्यामुळे जातपंचायतीतील सदस्यांविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जातीतून वाळीत टाकणे, समाजात असंतोष आणि द्वेष पसरवणे, गुन्हेगारी प्रकारचा कट रचून तेढ निर्माण करणे, अन्यायग्रस्तांना धमक्या देणे तसेच त्यांना मानसिक व शारीरिक इजा व संपत्ती नष्ट करण्याची धमकी देणे, अशा कलमांनुसार ११ आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

टॅग्स :Courtन्यायालयRaigadरायगडalibaugअलिबाग