शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वाळीत टाकलेल्या 80 कुटुंबांना न्याय मिळणार, खटल्यात आज शेवटचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:23 IST

आज सुनावणी : अंतिम युक्तिवादापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील पहिलाच खटला

अलिबाग : आगरी समाजातील जातपंचायतीने शहाबाज येथील ८० कुटुंबीयांना वाळीत टाकले होते़ या प्रकरणी स्थानिक जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे़ अंतिम युक्तिवादाच्या स्तरापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच खटला असल्याने या खटल्यातील निकालावर राज्यातील इतर अनेक वाळीत टाकलेल्या लोकांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांच्या समोर ८० वाळीतग्रस्त कुटुंबांच्या वतीने अ‍ॅड. सरोदे यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. तर आता सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतील व त्यावर अ‍ॅड. सरोदे यांचा प्रतिवाद होऊन नंतर या प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे़या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना अ‍ॅड. सरोदे म्हणाले, २०१३ मध्ये कमळपाडा वस्तीतील मधुकर पाटील (फिर्यादी) यांच्यासह ८० कुटुंबांना वाळीत टाकल्यामुळे जातपंचायतीतील सदस्यांविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जातीतून वाळीत टाकणे, समाजात असंतोष आणि द्वेष पसरवणे, गुन्हेगारी प्रकारचा कट रचून तेढ निर्माण करणे, अन्यायग्रस्तांना धमक्या देणे तसेच त्यांना मानसिक व शारीरिक इजा व संपत्ती नष्ट करण्याची धमकी देणे, अशा कलमांनुसार ११ आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

टॅग्स :Courtन्यायालयRaigadरायगडalibaugअलिबाग