शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:54 IST

उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वडखळ : उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला व आता पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.परिसरातील पाणीटंचाई दूर व्हावी, म्हणून खारपाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण तुरे यांनी जेएसडब्ल्यूच्या पाटणसई येथील पंपहाउसवर धडक दिली. या वेळी देवळी गाव अध्यक्ष धावजी तुरे किरण शिंदे, यशवंत ठाकूर, सुधाकर तुरे, सखाराम केणी, कमळाकर शिवकर आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते. ग्रामस्थानी पंपहाउसवर धडक दिल्याचे कळताच जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंर्पक अधिकारी अरुण शिर्के यांनी या ठिकाणी भेट देऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल व पाणी सोडण्याची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड