शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पशुसंवर्धन विभागात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची वानवा

By निखिल म्हात्रे | Updated: February 5, 2024 15:58 IST

अनेक कामे देखील खोळंबत आहेत. शिवाय पशुधनाचे आरोग्य धोक्यात येत आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या संवर्गाच्या ५४ पदांपैकी तब्बल २२ पदे रिक्त आहेत. तर पशुधन पर्यवेक्षकांची ७९ पैकी ४२ पदे रिक्त आहेत. तर तांत्रिक अधिकारी यांचे असणारे एकमेव पद देखील रिक्त आहे. परिणामी पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच कामांवर अतिरिक्त भार येत आहे. अनेक कामे देखील खोळंबत आहेत. शिवाय पशुधनाचे आरोग्य धोक्यात येत आहे.

या रिक्त पदांमुळे रायगड जिल्ह्यातील पशुपालकांच्या पशुधनास लसीकरण करणे, कृत्रिम रेतन, उपचार करणे, खच्चीकरण व ई सेवा प्रदान करतांना प्रचंड अडचणी येत आहेत. उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ३-४ ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार पडत आहे. यामुळे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन ताण सहन करावा लागत आहे. 

अपुऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा प्रत्यक्ष परिणाम हा जिल्ह्यातील पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांवर होत आहे. त्यांना या सर्व सेवा वेळेवर मिळत नाहीत. तसेच विविध शासकीय योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील पशुपालक, शेतकरी व गरजू नागरिकांना पोहोचवण्यात प्रचंड अडचणी व समस्या उद्भवत आहेत. यामुळे हकनाक पशुसंवर्धन विभागास जिल्ह्यातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुधन दवाखान्यातून आलेल्या अहवाल एकत्रित करणे, विविध योजना राबवणे, योजनेची तयारी करून घेणे, आर्थिक व्यवहार, औषधे यांचा लेखाजोखा ठेवणे आदी कामे या अधिकाऱ्यांची आहेत. ही कामे अतिरिक्त अधिकाऱ्याला करावी लागत आहेत.

मानधनावर पशुधन पर्यवेक्षक घेणे  राज्य शासनाचे पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी २ आहेत. त्यांना मानधनावर पशुधन पर्यवेक्षक (पदविका धारक) घेण्यास परवानगी आहे. फक्त जिल्हा परिषद स्तरावरील पशैद्यकीय श्रेणी २ दवाखान्यांना मानधनावर पशुधन पर्यवेक्षक (पदविका धारक) घेण्यास परवानगी नाही. तो परवानगी दिल्यास काही प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो.

रिक्त पदांमुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सर्वच ठिकाणी सेवा पुरवितांना अडचणी उद्भवतात. ही रिक्तपदे भरण्यात यावी यासाठी खात्याचे मा. सचिव, आयुक्त, मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.-डॉ. शामराव कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अलिबाग-रायगड

रिक्त पदांमुळे पशुधनावर उपचार व लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तसेच या विभागाच्या विविध योजना देखील लोकांपर्यंत पोहचत नाहीत.- संदेश पाटील, शेतकरी.

टॅग्स :Raigadरायगड