शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोर्लई कथित बंगले गुन्हा प्रकरण; गुन्ह्यातील तीनही ग्रामसेवकांना अटक पूर्व जामीन मंजूर

By राजेश भोस्तेकर | Updated: March 21, 2023 17:25 IST

अटकेपासून मिळाला दिलासा

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या कथित बंगले प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तत्कालीन तीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अटक पूर्व जामिनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तीनही ग्रामसेवक यांना अटक पूर्व जामीन मंजूर केल्याने अटके पासून मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामसेवक यांच्या वतीने ऍड प्रवीण ठाकूर यांनी युक्तिवाद केला. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीत १९ बंगले असून त्याबाबत माहिती लपवली असून फसवणूक झाली असल्याची तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार गुरुवारी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात श्रीमती संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच,  सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगलोचे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे यांनी जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन के मण्येर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. ऍड प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात ग्रामसेवक यांच्यावतीने भक्कम बाजू मांडली. 

तत्कालीन जागेचे मालक कै. अन्वय नाईक यांनी जागेत घरपट्टी लावण्यासाठी ग्रामपंचायत कडे अर्ज केला होता. मासिक सभेत सरपंच सदस्य यांनी अर्ज मंजुर केल्याने ग्रामसेवकांनी नियमानुसार काम करून आपले कर्तव्य बजावले आहे. कर आकारणी करणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे त्यामुळे त्यांनी कामात कुठेही कसूर केली नाही असा युक्तिवाद ऍड प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात मांडला. तसेच पोलीस चौकशीला पूर्ण सहकार्य केले जाईल अशी शास्वती ही न्यायलायला देण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन के मण्येर यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून तीनही ग्रामसेवकांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस