शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डिझेल परताव्याअभावी कोकणातील मच्छीमार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:09 IST

आंदोलनाचा इशारा । पारंपरिक व्यावसायिकांवर कर्जबाजारीचे संकट

- संजय करडे

मुरुड जंजिरा : राज्य शासनाकडून कोकणातील मच्छीमारांना मार्च २०१७ पासून डिझेल परताव्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत असून, ही रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी जसे आत्महत्या करतात, तशी वेळ मच्छीमारांवर आणू नका. किमान हक्काचा डिझेल परतावा तरी शासनाने तातडीने द्यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा बैले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. या वेळी त्यांच्या समवेत सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू उपस्थित होते.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत घोषित करून नुकसानभरपाई देऊन दिलासा दिला आहे. या उलट समुद्रात दिवसेंदिवस मत्स्य दुष्काळ पडत आहे. त्यामुळे मच्छीमारांची अवस्था बिकट झाली आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य पर्याय समोर नसल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शासन मत्स्यदुष्काळही जाहीर करीत नाही, त्यामुळे कोकणातील मच्छीमार त्रस्त आहेत.

ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रात अचानक उद्भवणाºया वादळाची मच्छीमारांमध्ये प्रचंड भीती आहे. मत्स्य विभागाने धोक्याचा इशारा देताच होड्या किनाºयावर आणल्या जातात. प्रसंगी होडीतील सामग्री फुकट जाते. या पार्श्वभूमीवर मच्छीमार संस्थांतील कर्मचाऱ्यांचे सहा महिने पगार होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

डिझेल परताव्याची रक्कम मार्च २०१७ पासून रायगड जिल्ह्यात मच्छीमारांना अदा केलेली नाही. यंदाचे २०१९ चे वर्ष मच्छीमांरासाठी दु:खाचे गेले असून, या वर्षात मासेमारी अत्यल्प प्रमाणात झाली असून मच्छीमारांचा सर्व खर्च वाया गेला असून, कोकणातील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. तरी शासनाने डिझेल परताव्याची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याची मागणी बैले यांनी केली आहे.मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची मागणीमत्स्यदुष्काळ जाहीर करावयास शासन का धजावत नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ऐन मासळी हंगामात कधी अवकाळी पाऊस तर वेगवान वारे, चंद्रप्रकाशाचा उद्रेक यामुळे गेले अनेक दिवस मासेमारी बंद करावी लागल्याने कोकणातील मासेमारी बंद आहे. त्यामुळे मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. शासनाने डिझेल परताव्याची रक्कम अदा करून मदतीचा हात द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा मच्छीमारांना दिला आहे. 

डिझेल परतावे दोन वर्षांपासून येणे बाकी आहेत, त्यामुळे मच्छीमार सदस्यांकडून बाकी वसूल होत नाही. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.- पांडुरंग आगरकर, अध्यक्ष,जय हनुमान मच्छीमार संस्थापत्रव्यवहार करूनही शासनाकडून डिझेल परतावा आलेला नाही. संस्थेकडे पैसे नसल्याने कर्मचाºयांचे सहा महिन्यांचे पगार देणे कठीण झाले आहे. डिझेल परतावा वेळेत न मिळाल्यास मच्छीमार संस्था अडचणीत येतील.- मनोहर मकू, उपाध्यक्ष,सागरकन्या मच्छीमार संस्था, मुरुड.