शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

खारभूमी विभागाने केला संरक्षक बंधाऱ्यांचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 00:55 IST

चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली.

अलिबाग : चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात तब्बल २४ ठिकाणचे संरक्षक बंधारे उद्ध्वस्त झाले होते. येणारी आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मेहनतीने ते बंधारे बांधले होते. आता खारभूमी विभागाने जागेवर जाऊन पंचनामा केल्यामुळे कामाचे अंदाजपत्रक लवकरच तयार होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.‘रोजगार हमी योजनेतील मजुरी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा’ या मथळ््याखाली लोकमतने सर्वप्रथम चरी आणि शहापूरमधील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. वृत्त प्रसिद्ध होताच खारभूमी विभागाचे अधिकारी तातडीने चरी आणि शहापूर गावात पोचले.आॅगस्ट महिन्यात चरी येथील तीन आणि शहापूर येथील २१ बंधारे अतिवृष्टीने समुद्राला आलेल्या उधाणाच्या पाण्याने फुटले होते. त्यातील बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. त्याची पाहणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे नव्याने फुटलेल्या बंधाºयांचा पंचनामा त्यांनी केला.आपत्तीमुळे फुटलेले संरक्षक बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. हे काम रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून केलेल्या कामाची मजुरी ग्रामस्थांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती. मात्र, खारभूमी उपअभियंता आणि अलिबागचे तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम संबंधित अधिकाºयांच्या पगारातून वसूल करावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे कामचुकार अधिकाºयांची तातडीने बदली करावी अशीही मागणी करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासन आणि खारभूमी विभाग खडबडून जागे झाले. खारभूमी विभागाने तातडीने घटनास्थळी आता धाव घेतली आहे. गावातील फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची पाहणी खारभूमी विभागाचे कनिष्ठ अभियंता एम. जी. पाटील आणि शुभम चव्हाण यांनी केली. तसेच ग्रामस्थांनी कोणते बंधारे उभारले आहेत त्याबाबतचे मोजमाप आमच्याकडून घेतल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अधिक माहितीसाठी खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांच्याशी संपर्क झाला नाही.>गावात नव्याने चार संरक्षक बंधारे फुटले आहेत. त्यातील एका बंधाºयाचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. हा बंधारा सुमारे ३० फुटांहून अधिक फुटला आहे. खारभूमी अधिकाºयांना त्याचे मोजमाप करताना मीटरपट्टीची टेप कमी पडली. त्यामुळे दोन वेळा मोजमाप करावे लागले. यावरूनच बंधारा किती मोठ्या प्रमाणात फुटला असेल याची गंभीरता दिसून येते, असेही श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी स्पष्ट केले.