शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

तब्बल ४९ वर्षांनी सरकारचे खारभूमी विकास मंत्री खारेपाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:20 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली होती.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली होती. त्यानंतर याच खारेपाटातील हजारो एकर भातशेती संरक्षक बंधारे फुटून खाºया पाण्याखाली जावून नापिकी झाली. परंतु ४९ वर्षांच्या कालखंडात कोणत्याही राज्य सरकारचे खारभूमी विकास मंत्री या खारेपाटात फिरकले नाहीत.तब्बल ४९ वर्षांनी राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात येवून मानकुळे, सोनकोठा, हाशिवरे, पोफेरी आणि नवीन मिळकत या खारभूमी योजनांची खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांसमवेत पाहणी केली. याबद्दल खारेपाटातील शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.मात्र खारभूमी विकास मंत्री रावते यांनी या त्यांच्या दौºयात संरक्षक बंधारेफुटीच्या समस्येने ग्रस्त शेतकºयांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली असती तर अधिक आनंद झाला असता. समस्याग्रस्त शेतकºयांना ‘आपले सरकार’ बरोबर प्रत्यक्ष खारभूमीच्या अडचणी, आपत्कालीन योजना व व्यवस्थापन, रोजगाराच्या संधी आणि खारेपाटातील शेतकºयांनीच तयार केलेला नावीन्यपूर्ण समृद्ध खारेपाटाचा पथदर्शी प्रकल्प याबाबत बोलता आले असते, अशी भूमिका या दौºयाच्या निमित्ताने श्रमिक मुक्ती दलाच्या महिला शेतकरी प्रतिनिधी मधुरा भास्कर पाटील आणि सुधा राजन भगत यांनी रविवारीच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांनी खरेतर या दौºयाबाबत माहिती शेतकºयांना देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी देखील ती दिली नाही. जिल्हाधिकारी या नात्याने आपण खारभूमीच्या प्रश्नाबाबत खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीचे आयोजन केले तर खारभूमीच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होवून अनुत्पादक खारजमिनी पुन्हा उत्पादक होवू शकतात.त्याचबरोबर पालकमंत्री पाणंद रस्ते, भात खाचरातील मत्स्यशेती, विशेष जिताडा माशांचे उत्पादन,संरक्षक बंधाºयाला लागून सोलर वीजनिर्मिती यातून स्थानिक रोजगारांच्या संधी पुन्हा उपलब्ध होवू शकतात असा आमचा विश्वास असल्याचे या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाचखारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या रविवारच्या दौºयादरम्यान पाहणी करताना बंगलाबंदर ते हाशिवरेखार हा सुमारे साडे आठ किमी लांबीचा समुद्र संरक्षक बंधारा त्याचबरोबर माणकुळे खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाच केले आहे. खारेपाटीतील फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचा प्रश्न सोडविण्याकरिता सर्व ते प्रयत्न करण्यात येतील असेही सांगितले. दौºयात त्यांच्या समवेत खारभूमी विकास विभागाचे अधिकारी, रायगड जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सरपंच सुजित गावंड आदि उपस्थित होते.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते