शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खंडोबाचा पालखी सोहळा जल्लोषात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:35 IST

वरसोली गावातून निघाल्या दोन पालख्या : ४० वर्षांची परंपरा झाली खंडित

अलिबाग : माघ पौर्णिमेनिमित्त वरसोली येथे मंगळवारी रात्री उशिरा खंडोबाचा पालखी सोहळा पार पडला. यातील विशेष बाब म्हणजे वरसोली कोळी समाज आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून खंडोबा मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी वाद सुरू आहेत. कोळी समाजाने पालखी काढण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. परंतु कोळी समाज आणि खंडोबा देवस्थान ट्रस्टने दोन वेगवेगळ््या पालख्या काढल्याने ही परंपरा तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा खंडित झाली.

कोळी समाजाने काढलेल्या पालखी सोहळ््याला ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी करत यळकोट यळकोट जय मल्हार अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.वरसोली गावामध्ये कोळी समाजाची मोठ्या संख्येने वस्ती आहे. खंडोबा हे कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे. खंडोबाचे सर्वच उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा येथील कोळी समाजाने आजही तितकीच मनोभावे जपली आहे. माघ पौर्णिमा असल्याने या दिवशी खंडोबाची पालखी काढण्याची परंपरा आहे. कोळी समाजाने पालखी काढण्याची तयारी केली होती, परंतु खंडोबा देवस्थान ट्रस्टनेही पालखी काढण्याचे ठरवले होते. गेल्या वर्षी ट्रस्ट आणि कोळी समाज यांच्यामध्ये पालखी काढण्यावरुन एकमत होत नव्हते. त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी दोघांमध्ये समन्वय साधत पालखी काढण्याचा मान ट्रस्टींना दिला होता. मात्र ट्रस्टींवर खंडोबा मंदिर बांधून पूर्ण करण्याची दिलेली जबाबदारी गेल्या सहा वर्षात पूर्ण केलेली नाही. त्यामुळे कोळी समाजामध्ये चांगलीच खदखद आहे, असे कोळी समाजाचे अध्यक्ष गणेश आवारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मंगळवारी साजरा होणाऱ्या पालखी सोहळ््याचा मान समाजानेच घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तयारी सुरु केली. त्यानंतर ट्रस्टनेही मागे न हटता पालखी काढण्याचे ठरवले होते. वरसोलीचे सरपंच मिलिंद कवळे आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी कोळी समाज आणि ट्रस्टी यांच्यामध्ये समझोता घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघे आपापल्या मतांवर ठाम राहिले. त्यामुळे गावातून दोन पालख्या काढण्यात आल्याचे सरपंच मिलिंद कवळे यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवूनच पालख्यांना हिरवा कंदील देण्यात आला होता. त्यामुळे वरसोली गावामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे वरसोली गावाला पोलीस छावनीचे स्वरूप आले होते.च्पालखी काढण्यासाठी आधी ट्रस्टला सांगण्यात आले. त्यानुसार ट्रस्टने शांततेने पालखी काढली. त्यानंतर कोळी समाजाने सायंकाळी पालखी उत्सवाला सुरुवात केली. खंडोबाची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढून भंडारा उधळण्यात आला. त्यावेळी अख्खा गाव या आनंदी सोहळ््यात तल्लीन झाल्याचे दिसून आले. आबालवृध्दांसह महिलांनी संगीताच्या तालावर ठेका धरला. महिलांनी पारंपरिक वेश परिधान केल्याने त्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. कोळी समाजानेही कायद्याचे पालन करत पालखी उत्सव शांततेत पार पाडला.

टॅग्स :JejuriजेजुरीRaigadरायगड