शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

“इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2023 23:59 IST

Raigad Irshalwadi Landslide Incident: गावाजवळच इर्शाळवाडी स्थलांतराचा प्रस्तावावर काम सुरू केले होते. वर्षानुवर्षे तिथेच राहत असल्यामुळे ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते.

Raigad Irshalwadi Landslide Incident:रायगडमध्ये इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावावर दरड कोसळली. यामध्ये ४० हून अधिक घरे गाडली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफचे जवान काम करत आहेत. परंतू, पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत ९८ जणांना वाचविण्यात आले आहे. मात्र, यातच आता इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना यापूर्वीच स्थलांतरित होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती, अशी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी गावात रात्रीच्या अंधारात गावकरी झोपेत असताना घरांवर दरड कोसळली. गावातील १७ ते १८ घरे या दरडीखाली दबली गेली. हा परिसर शासनाच्या दरडींच्या धोक्याची गावातील यादीतही नव्हता. अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, कोकणात पडणारा दरवर्षी मुसळधार पाऊस आणि डोंफरच्या पायथ्याशी असलेले गाव अशी सगळीच धोकादायक परिस्थिती लक्षात घेता लक्षात घेता यापूर्वीच ग्रामस्थांना तेथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते अशी माहिती इर्शाळवाडीच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली आहे. 

नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच केली होती

नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती. आमच्याच गावाजवळ शंभर एकर एक परिसर आहे. त्या ठिकाणी आपण या इर्शाळवाडीला नवीन घरांचा स्थलांतराचा प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू केले होते. पण, या ठिकाणी अशी काही घटना घडेल याची सुतराम कल्पना आणि शक्यता तिथल्या परंपरागत राहायला असेलल्या ग्रामस्थांनाच नव्हे तर आम्हाला नव्हती, असेही रितू ठोंबरे म्हणाल्या. तसेच परंपरागत घरे तिथे असल्याने ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते. मात्र, आत्ताची नवीन पिढी आहे ती काम धंदानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर राहते आहे. रात्री घडलेली घटना ही अक्षरशः मन सुन्न करणारी अशीच आहे. मात्र, या सगळ्या मोठ्या प्रसंगांमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच कायम आहोत त्यांना जी काही मदत लागेल ती मदत ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

दरम्यान, या किल्ल्याच्या पायथ्याशी जे छोटी दुकानाला लावतात आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालतो, त्यांच्यासाठी आम्ही शासनाच्या टीबीडी योजनेत प्रस्ताव केले असून या योजनेतून त्याला दरवर्षी मदत दिली जाते. बुधवारीच आपण या परिसरात जाऊन आलो होतो. हा सगळा भाग अतिशय उंचावर आहे आणि मुख्य गावापासूनही लांब आहे त्यामुळे आपण त्या सगळ्याना गावाजवळ वास्तव्यासाठी येण्याची विनंती यापूर्वीच केली होती, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणRaigadरायगड