शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खैरे धरण जलशुद्धीकरण यंत्रणा ४ वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 04:30 IST

२२ गावे आणि २९ वाड्यांना पाणीपुरवठा बिले रखडली निधीची प्रतीक्षा

सिकंदर अनवारे 

दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाची जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून धरणाच्या दुरुस्तीकरिता निधीच उपलब्ध झालेला नाही. यामुळे पाण्यावर प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याने परिसरात ऐन पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. वारंवार मागणी करूनही पैसे उपलब्ध होत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

महाड तालुक्यातील खाडीपट्टा भागात खैरे गावाजवळ येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता धरण बांधण्यात आले. खाडी प्रदूषण आणि जमीन प्रदूषणाचे कारण पुढे करत स्थानिकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेती ओसाड पडत गेली. धरणाच्या पाण्याचा वापर केवळ आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. या धरणाच्या माध्यमातून ऐन पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याची तक्र ार स्थानिक नागरिकांनी केली. ऐन पावसाळ्यात हे गढूळ पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला होता.धरणाच्या शेजारीच असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले. यातील काही पंप नादुरुस्त झाले आहेत. यामुळे आरोग्याची समस्या उदभवण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.खैरे गावाच्या जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हा प्रकल्प उभा केला असून सन २00९ मध्ये हा प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आला. या प्रकल्पाचा वापर सध्या केवळ पिण्याच्या पाण्याकरिता होत आहे.परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांची तहान हा प्रकल्प भागवत असून यामध्ये गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे सुतारकोंड, चिंभावे मोहल्ला, बेबलघर, तेलंगे, आदीस्ते, खैरे, रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील, वामने या गावांचा समावेश आहे. जवळपास १०,३१४ लोकसंख्येला हा पाणीपुरवठा होत आहे.गेल्या चार वर्षांत दुरुस्ती निधी आलेला नाही. याकरिता खासगी ठेका पद्धतीने काम केले जात असून प्रतिवर्षाला किमान ४० लाख रुपयांचे टेंडर मंजूर होते. यामध्ये या ठिकाणी काम करणारे कामगार, लागणारे क्लोरीन, तुरटी यावर खर्च केला जातो. वर्षाला ४० लाख रुपये खर्च होत असताना दुरुस्ती का होत नाही याकरिता दुरूस्ती निधीची वाट का पाहावी लागते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणीपट्टी थकबाकीच्परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा कायम होत असतो. यामुळे ग्रामस्थांकडून प्रतिघर १०० रुपये तर प्रति स्टँड पोस्टमागे ९० रुपये कर आकारणी केली जाते.च्ही पाणीपट्टी वसूल करण्याकरिता खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात सुमारे ८२ लाख रुपये थकबाकी येणे आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता किंवा प्रकल्पाच्या दुरुस्ती निधीकरिता पाणीपट्टी वसुली देखील महत्त्वाची आहे.च्केवळ क्लोरिनेशन, तुरटी प्रक्रि या करूनच पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्यात गढूळ पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले. जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या बाजूला असलेल्या एका टाकीला गळती असल्याने बाजूचे पाणी टाकी रिकामी झाल्यानंतर आत ओढले जाते.च्फिल्ट्रेशन, स्प्रिंकलर, पंपिंग, एरीएशन, सँड फिल्टर, क्लोरीनेशन, तुरटी या प्रक्रि येतून गेल्यानंतर हा पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षांपासून यातील काही पंप, सँड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे.खैरे धरणातून २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या चार वर्षांत दुरुस्ती निधी प्राप्त झालेला नाही. येथील सँड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे. शिवाय थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात वसूल होणे आहे.- जे.एन.पाटील, उपअभियंता महाड१0,३१४लोकसंख्येला धरणातून होतो पाणीपुरवठा

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड