शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

विकासाच्या परिघावर कातकरी उपरेच!

By admin | Updated: September 6, 2015 22:20 IST

महिगाव येथील कुटुंबांची दैनावस्था : ना रस्ता, ना पाणी; ना रोजगार, ना आरक्षणाचा लाभ

सायगाव : अनेक पंचवार्षिक आल्या गेल्या, अनेकदा सत्तापालट झाला, विकासाच्या त्याच त्या पोकळ घोषणा झाल्या. जुने गेले, नवे आले, तेच ते कित्ते गिरवून झाले; पण विकास कशाला म्हणतात ते गरीब जमातील अजून माहीतच नाही. कारण गेल्या पन्नास वर्षांत यांच्या वस्तीपर्यंत स्वातंत्र्य अजून फिरकलंच नाही. स्वातंत्र्याचं केलं काय? आमच्या वाट्याला आलंच नाय, असा परखड प्रश्न आता हे आदिवासी विचारू लागलेत. सायगाव विभाग हा तालुक्याच्या तुलनेत विकसित मानला जातो; मात्र या पुढारलेल्या गावांना लागून गावकुसाच्या अडोशाने गेले कित्येक वर्षे आदिवासी कातकरी समाज खितपत पडलेला आहे. ओढ्यातील खेकडे, मासे पकडून त्यावर कशीबशी उपजीविका करीत आहेत. अनेकदा पुराच्या पाण्याचा धोका आणि लगतच असलेली स्मशानभूमी अशा दुरवस्थेत राहणाऱ्या लोकांना काही वर्षांपूर्वी हौसाबाई यशवंत सणस आणि यशवंत सणस यांनी आपली हक्काची जागा उपलब्ध करून दिली. महिगावपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगरालगत पायथ्याला गेली कित्येक वर्षे सुमारे अठरा कुटुंबे अत्यंत बिकट अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. अत्यल्प शिक्षणामुळे कुठेही रोजगार मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या रोजगारावर मिळेल तेव्हा शेतमजुरी करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यांना पाणी असल्याने मासे, खेकडे फार कमी मिळतात. एवढ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे जिकिरीचे बनते. घरात खाणारी तोंडे भरपूर असल्यामुळे अनेकदा कर्जाशिवाय गत्यंतर नसते. मात्र, रोजगाराचे साधन नसल्याने परतफेडीची हमी मिळत नाही. अशावेळी संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करते. कुणाकडेही शेती नसल्यामुळे सर्व गोष्टी विकत घेऊन खाणे परवडत नाही. (वार्ताहर)कोण आहेत कातकरी ?कातकरी ही एक महाराष्ट्रातील प्रमुख आदिम शिकारी जमात समजली जाते. यांना कातकरी, काथोडी, दोर कातकरी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांत ओळख आहे. अत्यंत दयनीय, गरीब मागास समाज म्हणून ही जमात ओळखली जाते. शिकारीवर बंदी असल्याने ते फक्त मासे आणि खेकड्यांवर उपजीविका करतात. या जमातीचे कोठेही भक्कम नेतृत्व नाही. गावाच्या आडोशाने हे जीवन जगतात. श्रमिक सारख्या अनेक संस्था यांच्या स्थलांतर व उपजीविकेवर काम करत आहे. बचत गटामधून बांधणीचे प्रयत्नही शासन करीत आहे.पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या जमातीला सरपंचपदाची संधी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी दुर्लक्ष झाल्यामुळे हा समाज नेतृत्वापासून वंचित राहिला.  - बाळासाहेब सणस, कार्यकर्तामाझे आई-वडील मासे पकडायला जातायत; पण या दिवसात खूप कमी मासे मिळतात. आता कुणी कामावर बोलवले तर जाणार नाहीतर आजचा दिवस वाया.  - वसंत पवार, आदिवासी युवकगेली अनेक वर्षे आम्ही या आदिवासींसोबत राहतो; पण आजतागायत यांना रस्ता नाही, पाणी नाही. हे सर्व मिळाल्याशिवाय आज त्यांना गत्यंतर नाही.  - हौसाबाई सणस, आदिवासी कार्यकर्त्या