शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या परिघावर कातकरी उपरेच!

By admin | Updated: September 6, 2015 22:20 IST

महिगाव येथील कुटुंबांची दैनावस्था : ना रस्ता, ना पाणी; ना रोजगार, ना आरक्षणाचा लाभ

सायगाव : अनेक पंचवार्षिक आल्या गेल्या, अनेकदा सत्तापालट झाला, विकासाच्या त्याच त्या पोकळ घोषणा झाल्या. जुने गेले, नवे आले, तेच ते कित्ते गिरवून झाले; पण विकास कशाला म्हणतात ते गरीब जमातील अजून माहीतच नाही. कारण गेल्या पन्नास वर्षांत यांच्या वस्तीपर्यंत स्वातंत्र्य अजून फिरकलंच नाही. स्वातंत्र्याचं केलं काय? आमच्या वाट्याला आलंच नाय, असा परखड प्रश्न आता हे आदिवासी विचारू लागलेत. सायगाव विभाग हा तालुक्याच्या तुलनेत विकसित मानला जातो; मात्र या पुढारलेल्या गावांना लागून गावकुसाच्या अडोशाने गेले कित्येक वर्षे आदिवासी कातकरी समाज खितपत पडलेला आहे. ओढ्यातील खेकडे, मासे पकडून त्यावर कशीबशी उपजीविका करीत आहेत. अनेकदा पुराच्या पाण्याचा धोका आणि लगतच असलेली स्मशानभूमी अशा दुरवस्थेत राहणाऱ्या लोकांना काही वर्षांपूर्वी हौसाबाई यशवंत सणस आणि यशवंत सणस यांनी आपली हक्काची जागा उपलब्ध करून दिली. महिगावपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगरालगत पायथ्याला गेली कित्येक वर्षे सुमारे अठरा कुटुंबे अत्यंत बिकट अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. अत्यल्प शिक्षणामुळे कुठेही रोजगार मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या रोजगारावर मिळेल तेव्हा शेतमजुरी करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यांना पाणी असल्याने मासे, खेकडे फार कमी मिळतात. एवढ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे जिकिरीचे बनते. घरात खाणारी तोंडे भरपूर असल्यामुळे अनेकदा कर्जाशिवाय गत्यंतर नसते. मात्र, रोजगाराचे साधन नसल्याने परतफेडीची हमी मिळत नाही. अशावेळी संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करते. कुणाकडेही शेती नसल्यामुळे सर्व गोष्टी विकत घेऊन खाणे परवडत नाही. (वार्ताहर)कोण आहेत कातकरी ?कातकरी ही एक महाराष्ट्रातील प्रमुख आदिम शिकारी जमात समजली जाते. यांना कातकरी, काथोडी, दोर कातकरी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांत ओळख आहे. अत्यंत दयनीय, गरीब मागास समाज म्हणून ही जमात ओळखली जाते. शिकारीवर बंदी असल्याने ते फक्त मासे आणि खेकड्यांवर उपजीविका करतात. या जमातीचे कोठेही भक्कम नेतृत्व नाही. गावाच्या आडोशाने हे जीवन जगतात. श्रमिक सारख्या अनेक संस्था यांच्या स्थलांतर व उपजीविकेवर काम करत आहे. बचत गटामधून बांधणीचे प्रयत्नही शासन करीत आहे.पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या जमातीला सरपंचपदाची संधी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी दुर्लक्ष झाल्यामुळे हा समाज नेतृत्वापासून वंचित राहिला.  - बाळासाहेब सणस, कार्यकर्तामाझे आई-वडील मासे पकडायला जातायत; पण या दिवसात खूप कमी मासे मिळतात. आता कुणी कामावर बोलवले तर जाणार नाहीतर आजचा दिवस वाया.  - वसंत पवार, आदिवासी युवकगेली अनेक वर्षे आम्ही या आदिवासींसोबत राहतो; पण आजतागायत यांना रस्ता नाही, पाणी नाही. हे सर्व मिळाल्याशिवाय आज त्यांना गत्यंतर नाही.  - हौसाबाई सणस, आदिवासी कार्यकर्त्या