शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:32 IST

दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : एकीकडे भाऊचा धक्का- मोरा सागरी प्रवासी तिकिट दरात सप्टेंबरपासून २५ रुपये कमी होणार असतानाच दुसरीकडे करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवासासाठी तिकिट दरात १० रुपये वाढीची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करंजा करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी मार्गावरुन प्रवासासाठी पावसाळी हंगाम वगळता दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी प्रवास करतात.अवघ्या २० मिनिटांत रेवस आणि त्यानंतर तासाभरात अलिबाग गाठता येत असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्याशिवाय कोकणाकडे जाण्याचा शार्टकट म्हणूनही हा सागरी मार्गावर ओळखला जातो.

रस्त्याने एसटी अथवा इतर वाहनांतून अलिबाग गाठणे खार्चिक आणि अधिक वेळ लागतो.यामुळे कोणताही हंगाम असो या  करंजा -रेवस सागरी मार्गावरुन मुंबईतुन अलिबाग मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी नाही.तसेच अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बहुतांश शासकीय विभागांची मुख्यालये ही अलिबागमध्येच आहेत.त्यामुळे विविध शासकीय विभागांच्या कामांसाठी नागरिकांना अलिबाग गाठावे लागते. यामुळे करंजा -रेवस सागरी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.यामुळे या सागरी मार्गावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. करंजा-रेवस या सागरी मार्गावर सध्या आर.एन. शिपिंग आणि आर.के.बोटींग या खासगी दोन कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी बंदर विभागाने दिली आहे.सध्या प्रवासी संख्या रोडावली आहे.सध्या तिकिट दर २० रुपये आहे.मात्र महागाई वाढत चालली असल्याने इंधनाच्या दरातही भरमसाठ वाढ होत चालली आहे.त्यामुळे  वाहतुक खर्चातही वाढ झाली आहे.

यासाठी सप्टेंबरपासून तिकीट दरात १० रुपये वाढ करुन देण्याची मागणी बंदर विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती आर.के.बोटींगचे मालक राकेश कोळी यांनी दिली.मात्र तिकिट दरात वाढ करण्यासाठी बंदर विभागाने अद्यापतरी मंजुरी दिलेली नाही.मात्र मंजुरी मिळाली तर सप्टेंबरपासूनच करंजा -रेवस सागरी मार्गावरील प्रवासी तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता करंजा बंदर निरीक्षक देविदास जाधव यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड