शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:32 IST

दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : एकीकडे भाऊचा धक्का- मोरा सागरी प्रवासी तिकिट दरात सप्टेंबरपासून २५ रुपये कमी होणार असतानाच दुसरीकडे करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवासासाठी तिकिट दरात १० रुपये वाढीची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करंजा करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी मार्गावरुन प्रवासासाठी पावसाळी हंगाम वगळता दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी प्रवास करतात.अवघ्या २० मिनिटांत रेवस आणि त्यानंतर तासाभरात अलिबाग गाठता येत असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्याशिवाय कोकणाकडे जाण्याचा शार्टकट म्हणूनही हा सागरी मार्गावर ओळखला जातो.

रस्त्याने एसटी अथवा इतर वाहनांतून अलिबाग गाठणे खार्चिक आणि अधिक वेळ लागतो.यामुळे कोणताही हंगाम असो या  करंजा -रेवस सागरी मार्गावरुन मुंबईतुन अलिबाग मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी नाही.तसेच अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बहुतांश शासकीय विभागांची मुख्यालये ही अलिबागमध्येच आहेत.त्यामुळे विविध शासकीय विभागांच्या कामांसाठी नागरिकांना अलिबाग गाठावे लागते. यामुळे करंजा -रेवस सागरी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.यामुळे या सागरी मार्गावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. करंजा-रेवस या सागरी मार्गावर सध्या आर.एन. शिपिंग आणि आर.के.बोटींग या खासगी दोन कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी बंदर विभागाने दिली आहे.सध्या प्रवासी संख्या रोडावली आहे.सध्या तिकिट दर २० रुपये आहे.मात्र महागाई वाढत चालली असल्याने इंधनाच्या दरातही भरमसाठ वाढ होत चालली आहे.त्यामुळे  वाहतुक खर्चातही वाढ झाली आहे.

यासाठी सप्टेंबरपासून तिकीट दरात १० रुपये वाढ करुन देण्याची मागणी बंदर विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती आर.के.बोटींगचे मालक राकेश कोळी यांनी दिली.मात्र तिकिट दरात वाढ करण्यासाठी बंदर विभागाने अद्यापतरी मंजुरी दिलेली नाही.मात्र मंजुरी मिळाली तर सप्टेंबरपासूनच करंजा -रेवस सागरी मार्गावरील प्रवासी तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता करंजा बंदर निरीक्षक देविदास जाधव यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड