शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कंपोस्ट खतांसाठीचे खड्डे ‘रोहयो’तून भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधी वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक नामी शक्कल लढवली आहे. मजुरी अत्यल्प असल्याने

अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधी वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक नामी शक्कल लढवली आहे. मजुरी अत्यल्प असल्याने या योजनेकडे कोणीही फिरकत नसल्याने आता शेतकºयांनी शेतावर केलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केले खड्डे रोजगार हमी योजनेत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मजुरांची संख्या आपोआप वाढून निधी खर्च पडण्यास मदत मिळणार आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला रायगड जिल्हा लागूनच आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्याची ओळख उद्योगांचा जिल्हा अशी आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प सुरू आहेत. जिल्ह्यात विकासकामे होत असल्याने त्यांच्याकडून मिळणारा मजुरीचा दर हा किमान ४०० रु पयांपासून एक हजार रु पये प्रतिदिन असा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातून मोठ्या रकमेची मजुरी मिळत असल्याने सरकारच्या रोजगार हमी योजनेला कमी प्रतिसाद असल्याचे दिसून येते. सरकारकडून योजनेच्या माध्यमातून फक्त १९० रु पये प्रतिदिन दिले जातात. या मोठ्या रकमेचा विरोधाभास असल्याने मजूर स्वाभाविकदृष्ट्या खासगी क्षेत्रातील मजुरीकडे वळताना दिसतो.प्रत्येक कुटुंबाला रोजगार मिळावा यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात ही योजना सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते.यावर्षी साडेचार महिन्यांत केवळ ३० टक्के इतकाच निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यातील उद्योगांची वाढती संख्या आणि शासकीय योजनेत मिळणारा अत्यल्प रोजगार यामुळे रोहयोच्या कामाकडे जिल्ह्यातील कामगारांनी पाठ फिरविली आहे. यामुळे सरकारने वेगळी युक्ती करु न मजुरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु के ले आहेत.