शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कंपोस्ट खतांसाठीचे खड्डे ‘रोहयो’तून भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधी वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक नामी शक्कल लढवली आहे. मजुरी अत्यल्प असल्याने

अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील निधी वाया जाऊ नये यासाठी सरकारने एक नामी शक्कल लढवली आहे. मजुरी अत्यल्प असल्याने या योजनेकडे कोणीही फिरकत नसल्याने आता शेतकºयांनी शेतावर केलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केले खड्डे रोजगार हमी योजनेत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मजुरांची संख्या आपोआप वाढून निधी खर्च पडण्यास मदत मिळणार आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला रायगड जिल्हा लागूनच आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्याची ओळख उद्योगांचा जिल्हा अशी आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प सुरू आहेत. जिल्ह्यात विकासकामे होत असल्याने त्यांच्याकडून मिळणारा मजुरीचा दर हा किमान ४०० रु पयांपासून एक हजार रु पये प्रतिदिन असा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातून मोठ्या रकमेची मजुरी मिळत असल्याने सरकारच्या रोजगार हमी योजनेला कमी प्रतिसाद असल्याचे दिसून येते. सरकारकडून योजनेच्या माध्यमातून फक्त १९० रु पये प्रतिदिन दिले जातात. या मोठ्या रकमेचा विरोधाभास असल्याने मजूर स्वाभाविकदृष्ट्या खासगी क्षेत्रातील मजुरीकडे वळताना दिसतो.प्रत्येक कुटुंबाला रोजगार मिळावा यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात ही योजना सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येते.यावर्षी साडेचार महिन्यांत केवळ ३० टक्के इतकाच निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यातील उद्योगांची वाढती संख्या आणि शासकीय योजनेत मिळणारा अत्यल्प रोजगार यामुळे रोहयोच्या कामाकडे जिल्ह्यातील कामगारांनी पाठ फिरविली आहे. यामुळे सरकारने वेगळी युक्ती करु न मजुरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु के ले आहेत.