शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

न्यायाधीशांमधील वादामुळे न्याय व्यवस्थेला धोका-निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:57 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली

महाड : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. अजित फायटर्स क्लबच्या वतीने महाडमधील आजाद मैदानावर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.अनेक वर्षांपासून असंख्य खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करीत आहे. मात्र, १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आणि २६ /११ चा मुंबई दहशतवादी हल्ला या दोन महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करताना एक मोठे आव्हान होते. मात्र, दोन्ही खटल्यातील आरोपींवरील आरोप न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. कायदा सर्वांनाच समान आहे, न्यायालयाचा आदर आणि प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. न्यायालयाचा अनादर झाला तर लोकशाही तत्त्वाला तडा जाईल आणि सर्वत्र अराजकता माजेल, अशी खंत अ‍ॅड. निकम यांनी व्यक्त केली.भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगात आदर्श मानली जाते. या घटनेची पायमल्ली केली जात असेल तर त्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायालयाची शिस्त, औचित्य याला तडा जाऊ देता कामा नये, त्यालाच सुरुंग लावला जात असेल तर देशाच्या अस्थिरतेला धोका पोहचू शकतो आणि देशाच्या लोकशाहीलाही अत्यंत घातक असल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, अजित फायटर्सचे अध्यक्ष अशोक भिलारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम