शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

न्यायाधीशांमधील वादामुळे न्याय व्यवस्थेला धोका-निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:57 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली

महाड : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. अजित फायटर्स क्लबच्या वतीने महाडमधील आजाद मैदानावर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.अनेक वर्षांपासून असंख्य खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करीत आहे. मात्र, १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आणि २६ /११ चा मुंबई दहशतवादी हल्ला या दोन महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करताना एक मोठे आव्हान होते. मात्र, दोन्ही खटल्यातील आरोपींवरील आरोप न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. कायदा सर्वांनाच समान आहे, न्यायालयाचा आदर आणि प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. न्यायालयाचा अनादर झाला तर लोकशाही तत्त्वाला तडा जाईल आणि सर्वत्र अराजकता माजेल, अशी खंत अ‍ॅड. निकम यांनी व्यक्त केली.भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगात आदर्श मानली जाते. या घटनेची पायमल्ली केली जात असेल तर त्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायालयाची शिस्त, औचित्य याला तडा जाऊ देता कामा नये, त्यालाच सुरुंग लावला जात असेल तर देशाच्या अस्थिरतेला धोका पोहचू शकतो आणि देशाच्या लोकशाहीलाही अत्यंत घातक असल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, अजित फायटर्सचे अध्यक्ष अशोक भिलारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम