शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर

By राजेश भोस्तेकर | Updated: July 25, 2024 16:46 IST

बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे. 

अलिबाग ::रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने अलिबाग येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेली जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज भरकटल्याने कुलाबा किल्ल्याजवळ अडकला आहे. यात कोणतीही दुर्घटना घडलेली नसली तरी बार्ज आणि त्यातील अडकलेल्या १४ जणांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोस्ट गार्ड आणि कंपनी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे. 

अलिबाग येथून जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज ही रत्नागिरी येथील जयगड पोर्टवर माल घेऊन गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी निघाली होती. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट असल्याने रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच समुद्रही खवळलेला असून भरती आलेली आहे. या परिस्थितीत मालवाहू बार्ज हे कुलाबा किल्ल्याजवळ आले असता मुसळधार पाऊस आणि खवललेल्या समुद्राच्या लाटांच्यामध्ये अडकल्याने बार्ज भरकटू लागले. बार्ज चालकाने प्रसंगवधन दाखवून बार्ज किनाऱ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला.

समुद्राला भरती ही असल्याने बार्ज हे भरकटून कुलाबा किल्ल्याच्या मागे अडकले. बार्जच्या इंजिन मध्ये पाणी गेले असल्याने अखेर चालकाने नांगर टाकून थांबवले आहे. जयगड पोर्ट प्रशासन, कोस्ट गार्ड हे संपर्कात आहेत. बार्ज मध्ये १४ जण कर्मचारी असून सर्व सुखरूप आहेत. त्यांना सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जे एस डब्लू प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनीही अलिबाग समुद्रकिनारी येऊन पाहणी केली असून संबंधितांना याबाबत सूचना केल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग