शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर

By राजेश भोस्तेकर | Updated: July 25, 2024 16:46 IST

बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे. 

अलिबाग ::रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने अलिबाग येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेली जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज भरकटल्याने कुलाबा किल्ल्याजवळ अडकला आहे. यात कोणतीही दुर्घटना घडलेली नसली तरी बार्ज आणि त्यातील अडकलेल्या १४ जणांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोस्ट गार्ड आणि कंपनी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे. 

अलिबाग येथून जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज ही रत्नागिरी येथील जयगड पोर्टवर माल घेऊन गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी निघाली होती. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट असल्याने रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच समुद्रही खवळलेला असून भरती आलेली आहे. या परिस्थितीत मालवाहू बार्ज हे कुलाबा किल्ल्याजवळ आले असता मुसळधार पाऊस आणि खवललेल्या समुद्राच्या लाटांच्यामध्ये अडकल्याने बार्ज भरकटू लागले. बार्ज चालकाने प्रसंगवधन दाखवून बार्ज किनाऱ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला.

समुद्राला भरती ही असल्याने बार्ज हे भरकटून कुलाबा किल्ल्याच्या मागे अडकले. बार्जच्या इंजिन मध्ये पाणी गेले असल्याने अखेर चालकाने नांगर टाकून थांबवले आहे. जयगड पोर्ट प्रशासन, कोस्ट गार्ड हे संपर्कात आहेत. बार्ज मध्ये १४ जण कर्मचारी असून सर्व सुखरूप आहेत. त्यांना सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जे एस डब्लू प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनीही अलिबाग समुद्रकिनारी येऊन पाहणी केली असून संबंधितांना याबाबत सूचना केल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग