शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांचा प्रवास धोक्याचा

By admin | Updated: December 22, 2015 00:35 IST

तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत.

दासगाव : तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत. अन्य पर्याय नसल्याने जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असल्याने येथील ४० गावातील ग्रामस्थांनी सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल बांधावा अशी मागणी केली आहे.महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणारी ही खेडेगावे असून या गावात मोठ्याप्रमाणावर व्यापार उद्योग व्यवसाय आहे. तसेच शेकडो वर्षांपासून सुरू असलेला सुक्या मासळीचा आठवडी बाजारही येथे भरतो. तसेच येथे आठवडी बाजार ही भरण्यात येतो. या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यातील जवळपास शेकडो गावे मासळी खरेदीसाठी येत असतात. तसेच पुरातन काळापासून दासगाव येथील बाजारपेठ प्रसिध्द आहे. या गावालगतच सावित्रीखाडी असून त्यापलिकडे जवळपास ४० अतिदूर्गम भागातील गावे आहेत. या गावांना शिवाजी महाराजांच्या काळापासून दासगाव बाजारपेठ नजीक असल्याने खाडीवर होडीने या गावातील ग्रामस्थ दासगाव बाजारपेठेला दैनंदिन, गृहोपयोगी, व्यवसायानिमित्त भेट देत असे. आजही मोठ्यासंख्येने या खाडीपलीकडील गावातील ग्रामस्थ होडीने प्रवास करून बाजारासाठी तसेच महामार्गाने अन्य ठिकाणी जाण्यासाठी दासगाव येथे येत असतात. दासगावला लागूनच मुंंबई-गोवा महामार्ग गेला आहे. गोठे, तुडील, जुई कुंबले, रावढळ, नरवण, खुटील, आदिसते, नडगाव, वामणे, सापे व अन्य असे जवळपास ४० गावातील ग्रामस्थांना मुंबई-पुणे, रत्नागिरी, गोवा आदी शहरांकडे जावयाचे असेल तर होडीचा प्रवास करून दासगावात येतात, मात्र महामार्गावर येणे जवळ पडते. आजही जलवाहतूक करून दासगाव याठिकाणी खाडीपलिकडील या गावातील नागरिकांना अन्य शहरामध्ये जाण्यासाठी आंबेत, टोळफाटा किंवा महाड असा जवळपास १५ कि.मी.चा अंतर प्रवास करावा लागतो. अत्यंत जिकिरीचा व आर्थिक भुर्दंड देणारा दूरचा प्रवास आहे. याकरिता सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल झाल्यास या खाडी पलिकडच्या नागरिकांची फारमोठी गैरसोय दूर होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. ४० गावातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी असूनही सरकारने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)