शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पत्रकार उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:21 IST

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन आज आठ

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन आज आठ वर्षे झाली तरी देखील अद्याप ५० टक्के काम पूर्ण झालेले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगडसह कोकणातील पत्रकार रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख व कोकण मराठी परिषदेचे किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महामार्गावर वडखळ नाक्यावर मानवी साखळी व पोस्टर आंदोलन करणार आहेत.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी गेली नऊ वर्षे रायगड व कोकणातील पत्रकार विविध आंदोलनाद्वारे शांततेच्या मार्गाने लढत आहेत. पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. सुरु वातीला हे काम युध्दपातळीवर सुरू होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या व जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे तसेच पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य बनले आहे. पळस्पा ते झाराप, कशेडी घाटापर्यंत रोज कुठे ना कुठे अपघात होत असून त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, परंतु त्याकडे राज्य व केंद्र शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जाणिवेतून पत्रकार रस्त्यावर उतरणार असून सोबत विविध संस्था, वाहनचालक संघटना या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी सर्व पत्रकार व जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल, कार्याध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, धर्मानंद गायकवाड यांनी केले आहे.