शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:37 IST

पर्यटक नाराज : नियमांचे उल्लंघन के ल्याची महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची माहिती

मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने गुरुवारपासून बंद केली आहे. त्यामुळे शेकडो पर्यटक नाराज होऊन माघारी परतत होते. या वेळी पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राजपुरी जेट्टीवरून शिडाच्या बोटी बंद करण्यात आल्याचे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून सांगण्यात आले. प्रत्येक बोटीला ठरावीक प्रवासी क्षमता असताना अतिरिक्त प्रवासी घेऊन जातात. तसेच प्रत्येक प्रवासी वर्गाने लाइफ जॅकेट घालणे बंधनकारक असताना हा नियमसुद्धा पाळला जात नसल्याने अखेर सर्व बोटी बंद करण्यात आल्याचे सांगितले. याबाबत आपली भूमिका मांडताना जंजिरा जल वाहतूक पर्यटक संस्थेचे चेरमन इस्माईल आदमने व व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लोक हजारोच्या संख्येने राजपुरी येथे येतात. वाढती गर्दी लक्षात घेता बोटींमधून जास्त पर्यटक किल्ल्यावर लवकर जाण्यासाठी व त्यांचा वेळ जाऊ नये, यासाठी जास्त संख्येने जरी पर्यटक नेत असतो, यासाठी बोर्डाने त्यांचा माणूस नियुक्त करून यामध्ये सुसूत्रता आणावी. १९७७ पासून आमची संस्था जंजिरा किल्ल्यावर ने-आण करण्याचे काम करीत आहे. एवढ्या वर्षात या ठिकाणी कोणताही अपघात घडलेला नाही. आम्ही पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत आहोत. आमच्याकडून काही चूक झाली तेव्हा आम्हाला दंडसुद्धा आकारलेला आहे; परंतु अचानकपणे बोटी बंद करून शेकडो पर्यटकांची गैरसोय के ली.आमच्या प्रत्येक बोटीमध्ये लाइफ जॅकेट आहेत; परंतु पर्यटक आपले कपडे खराब होतील म्हणून लाइफ जॅकेट घालत नाहीत. त्याला संस्था कशी जबाबदार ठरू शकते, असा सवाल करून यासाठी बोर्डाने अंमलबजावणी करावी, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी भूमिका या वेळी त्यांनी स्पष्ट केली. प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी घेतलेली भूमिका बोटचालकांना पटलेली नसून सागरी आंदोलनाच्या माध्यमातून सर्व बोटधारक येथे उतरणार असून, या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून जंजिरा किल्ल्यावर बोट सुरू कराव्यात, अशी पर्यटक व नागरिक मागणी करीत आहेत.

विजय गिदी यांचा आंदोलनाचा इशाराया वेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ मुंबईचे संचालक व राजपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय गिदी यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जर येत्या तीन दिवसांच्या आत बोटी सुरू केल्या नाहीत तर सर्व शिडांच्या बोटीचे चालक-मालक आपल्या कुटुंबासह सागरी आंदोलन करतील, असा इशारा दिला.

बेकारीला कंटाळून जर एखाद्या बोटचालकाने भर समुद्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले तर याची सर्वस्वी जबाबदारी मेरी टाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपोनो यांची असेल, असे ते म्हणाले. सर्व बोटधारक लवकरच आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे या वेळी विजय गिदी यांनी सांगितले.

राजपुरी येथील बोटचालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. प्रवासी क्षमता कमी असताना जास्त प्रवासी नेणे त्याचप्रमाणे लाइफ जॅकेटचे वाटप न करणे, यामुळे तत्काळ बोटी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.- अजित टोपोनो, प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड