शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

जंजिरा किल्ल्यावरील जलवाहतूक बंद; पर्यटकांचे होणार हाल, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:04 IST

मुरुड : राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्याचे काम जंजिरा पर्यटक सोसायटी करीत होती; परंतु राजपुरी गावात राहणारे जावेद कारबारी यांनी वेलकम सोसायटी स्थापन करून

 नांदगाव/ मुरुड : राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्याचे काम जंजिरा पर्यटक सोसायटी करीत होती; परंतु राजपुरी गावात राहणारे जावेद कारबारी यांनी वेलकम सोसायटी स्थापन करून राजपुरी नवीन जेट्टी येथून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मान्यता मिळवून येथून पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे या दोन संघटनांमध्ये वाद निर्माण होऊन येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावर उपाय म्हणून अखेर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुरु ड येथील बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी १ डिसेंबरपासून जंजिरा किल्ल्यावरील सेवा बंद ठेवण्याचा लेखी आदेश दिल्याने असंख्य पर्यटकांना जंजिरा किल्ला न पाहताच परतावे लागणार आहे.

राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जंजिरा पर्यटक सोसायटी काम करीत आहे; परंतु महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून वेलकम सोसायटीलासुद्धा परवानगी दिल्याने धंद्यावर परिणाम होऊन बेकारी वाढेल, असे कारण पुढे करून वेलकम सोसायटीने येथून प्रवासी वाहतूक करण्यास मनाई केली. याबाबत येथील काही लोकांचा धक्काबुकी, तसेच किरकोळ वाद सतत सुरू होता. तहसीलदार व मुरु ड पोलीस ठाणे यांनीसुद्धा या दोन संघटनांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु हा वाद काही न मिटल्याने अखेर मुरु ड बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी १ डिसेंबरपासून सर्व सेवा बंद करण्याचा लेखी आदेश दिल्याने पर्यटकांना हा किल्ला आता पाहता येणार नाही. जंजिरा पर्यटक सोसायटी ही आपल्या व्यतिरिक्त इतरांना धंदा करू देत नसल्याने हा वाद चिघळला आहे. वेलकम सोसायटी हीसुद्धा स्थानिक लोकांची असून, त्यांनी धंदा केल्यास आपणावर बेकारी वाढेल, असे कारण देत वाद वाढवला आहे. या दोन संघटनांच्या वादामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर जाता येणार नाही. शुक्र वारपासून सगल तीन दिवस सुट्टी आल्याने हा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक येणार आहेत; परंतु त्यांची निराशा होणार हे स्पष्ट आहे.जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करण्यासाठी दोन संस्थांना जलवाहतुकीचा परवाना मिळाला होता; परंतु येथे पूर्वापार जलवाहतूक करणारी जंजिरा पर्यटक सोसायटी यांनी हरकत घेतल्याने या दोघांमध्ये समझोता होत नव्हता. इंजिन बोटीला परवानगी दिल्याने आमचा व्यवसाय घटेल, असा त्यांचा दावा होता. याबाबत मुरु ड तहसीलदार, मुरु ड पोलीस ठाण्याकडेसुद्धा बैठक होऊनसुद्धा तोडगा निघत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही जलवाहतूक बंद केली आहे. याबाबत आता जिल्हाधिकाºयांनी पुढील निर्णय घेतल्यावरच बोटी सुरू होतील.- अतुल धोत्रे, बंदर निरीक्षक,महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डमोठ्या उत्सुकतेने आम्ही किल्ला पाहावयास आलो होतो; परंतु वाहतूक बंद असल्याने आमची घोर निराशा झाली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन येथील वाद मिटवावा, त्यामुळे आम्हा पर्यटकांचे हाल होत आहेत.- प्रणव गायकवाड, पर्यटक, नागपूर 

 

टॅग्स :Raigadरायगड