शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जंजिरा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:25 IST

पर्यटक नाराज : कार्यालय बंद असल्याने बोटी, यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण रखडले

  संजय करडेलोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा मार्च महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील स्वयंरोजगार बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी पुरातन वास्तू पर्यटकांसाठी खुल्या केल्या, परंतु सध्या दीपावलीची सुट्टी असल्याने कार्यालये बंद असल्याचा फटका बोटधारकांना सहन करावा लागत आहे. कार्यालय बंद असल्याने १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण न झाल्याने व प्रवासी विम्याची कार्यवाही न केल्यामुळे अजूनपर्यंत जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला करूनही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने सध्या किल्ला बंद असून, पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. दिवाळी सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी बुधवार, १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत पूर्ण झाल्यावरच या किल्ल्यातील जलवाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, परंतु सध्या सुट्ट्या असल्याने शेकडोच्या संख्येने पर्यटक आपल्या वाहनाने जंजिरा किल्ला परिसरात येऊन जल वाहतूक बंद असल्याने नाराज होऊन परतत आहेत. पुरातत्त्व खात्यांच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने आम्हाला आद्यापपर्यंत किल्ल्यावरील जल वाहतूक सुरू करणार आहोत, असे लेखी कळविले नाही. त्यामुळे आम्हाला किल्ल्यातील स्वच्छता, तसेच ऑनलाइन तिकीट व्यवस्था करण्याची अंमलबजावणीही करता आलेली नाही. मेरिटाइम बोर्ड आम्हाला ज्यावेळी कळवेल, त्यावेळी आम्ही काम तातडीने सुरू करणार आहोत.महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे राजपुरी आगरदांडा विभागाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिक बोटींचे नूतनीकरण झालेले नाही, शिवाय प्रवासी विमाही काढलेला नाही असे सांगितले.

बोटींचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाकडे दीड महिन्यांपूर्वीच प्रकरणे सादर केली आहेत. प्रवासी विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून किल्ला बंद आहे. या भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला केला आहे. जल वाहतुकीच्या प्रक्रिया आपण लवकरच पूर्ण करू, परंतु जलवाहतूक सुरू करा.  -जावेद कारभारी, चेअरमन,वेल कम जल वाहतूक सोसायटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या