शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:25 IST

पर्यटक नाराज : कार्यालय बंद असल्याने बोटी, यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण रखडले

  संजय करडेलोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा मार्च महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील स्वयंरोजगार बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी पुरातन वास्तू पर्यटकांसाठी खुल्या केल्या, परंतु सध्या दीपावलीची सुट्टी असल्याने कार्यालये बंद असल्याचा फटका बोटधारकांना सहन करावा लागत आहे. कार्यालय बंद असल्याने १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण न झाल्याने व प्रवासी विम्याची कार्यवाही न केल्यामुळे अजूनपर्यंत जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला करूनही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने सध्या किल्ला बंद असून, पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. दिवाळी सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी बुधवार, १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत पूर्ण झाल्यावरच या किल्ल्यातील जलवाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, परंतु सध्या सुट्ट्या असल्याने शेकडोच्या संख्येने पर्यटक आपल्या वाहनाने जंजिरा किल्ला परिसरात येऊन जल वाहतूक बंद असल्याने नाराज होऊन परतत आहेत. पुरातत्त्व खात्यांच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने आम्हाला आद्यापपर्यंत किल्ल्यावरील जल वाहतूक सुरू करणार आहोत, असे लेखी कळविले नाही. त्यामुळे आम्हाला किल्ल्यातील स्वच्छता, तसेच ऑनलाइन तिकीट व्यवस्था करण्याची अंमलबजावणीही करता आलेली नाही. मेरिटाइम बोर्ड आम्हाला ज्यावेळी कळवेल, त्यावेळी आम्ही काम तातडीने सुरू करणार आहोत.महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे राजपुरी आगरदांडा विभागाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिक बोटींचे नूतनीकरण झालेले नाही, शिवाय प्रवासी विमाही काढलेला नाही असे सांगितले.

बोटींचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाकडे दीड महिन्यांपूर्वीच प्रकरणे सादर केली आहेत. प्रवासी विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून किल्ला बंद आहे. या भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला केला आहे. जल वाहतुकीच्या प्रक्रिया आपण लवकरच पूर्ण करू, परंतु जलवाहतूक सुरू करा.  -जावेद कारभारी, चेअरमन,वेल कम जल वाहतूक सोसायटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या