शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जांभूळपाडा, व-हाड पुलाची गंभीर दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:48 IST

वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे.

- विनोद भोईरराबगाव /पाली : वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील वºहाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. जुने बांधकाम असल्याने व सद्यस्थितीत जुना व जर्जर झालेला हा पूल केव्हाही कोसळून सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. पाली-खोपोली मार्गावर असलेला वºहाड येथील पूल अनेक गावांसह मुंबई, पुणे व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. सद्यस्थितीत पाली-खोपोली मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वºहाड येथील पुलाला आधार देणारे खांब मोडकळीस आले असून त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.पुलाच्या स्लॅबच्या ठिकठिकाणी शिगा निघाल्या आहेत. संरक्षण कठडेदेखील तुटून नदीत पडले आहेत. त्यामुळे वेगवान वाहन थेट नदीत कोसळून जीवघेणा अपघात होण्याची भीती वाढली आहे. वºहाड-जांभूळपाडा पुलावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविताना एक वाहन दुसऱ्या वाहनावर आदळून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अंबा नदीत पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्याचबरोबर या पुलावरु न अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे वेळीच या पुलाची दुरु स्ती झाली नाही तर कधीही हा पूल कोसळू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खोपोली, पुणे, मुंबई येथील औद्योगिक प्राधिकरण आणि विळे भागाड, महाड, रोहा आणि दक्षिण कोकणातील औद्योगिक प्राधिकरण येथील विविध कारखाने, कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी होत असलेली अवजड वाहनांची वाहतूकदेखील याच मार्गावरु न चालते. त्यामुळे शासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देवून पुलाची दुरु स्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड