शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

रायगड जिल्ह्यातील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ अभियान, सात तालुक्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:47 IST

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही २०१७ मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.

रोहा : महाराष्ट्र व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशनने स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या सुविधा पुरवण्यासाठी संशोधनाला अनुसरून काम करणाऱ्या अ‍ॅक्वाक्राफ्टच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या सात तालुक्यांतील २२ गावांत ‘जल पे चर्चा’ या अभियानाला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) ही २०१७ मध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संस्था असून, महाराष्ट्रात एक हजार आदर्श गाव निर्माण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. कॉपोर्रेट क्षेत्र आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने विकासासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एमव्हीएसटीएफने राष्ट्रउभारणीच्या या कामासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक-खासगी भागीदारी निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. त्याअंतर्गत या अभियानास नुकताच मुंबईत प्रारंभ झाला. या वेळी नीती आयोगाशी संबंधित अटल इनोव्हेशन मिशनचे डायरेक्टर आर. रामानन, स्पर्श गंगा अभियानाच्या प्रमुख आरुषी निशंक, आर. डी. नॅशनल कॉलेजच्या आय. सी. प्राचार्या डॉ. नेहा जगतानी उपस्थित होत्या. हे अभियान जागतिक जलदिनी मार्चमध्ये संपणार आहे.ग्रे वॉटर मॅनेजमेंट व पाणीबचतीच्या इतर उपायांच्या साहाय्याने पाण्याचे नवे स्रोत तयार करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि जलस्रोतांची वाढ या विषयावर या अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एमव्हीएसटीएफ व अ‍ॅक्वाक्राफ्ट करत आहे. त्याचबरोबर जलबचतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे. एमव्हीएसटीएफ आणि अ‍ॅक्वाक्राफ्टचे हे अभियान महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांतील ९८ तालुक्यांमध्ये राबवले जाणार आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, तळे, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यांतील २२ गावांचा समावेश आहे.युवकांचा सहभागया अंतर्गत जिल्हास्तरावर तरुणांना आवडणा-या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्यात जलशक्ती अभियान (जेएसए) या घटकाची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो (सीएमआरडीएफ) आणि जिल्हा एक्झिक्युटिव्ह या विषयावरील त्यांची मते आणि जलशक्ती अभियानांतर्गत (जेएसए) करण्यात आलेली कामे, आव्हाने आणि या अभियानाचा काय फायदा झाला, या गोष्टी सर्वांसमोर मांडणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखवण्यात येणार असून, कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी मुक्त संवादाच्या कार्यक्रमाबरोबरच प्रश्नमंजूषाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या अभियानात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमव्हीएसटीएफच्या वतीने तरुणांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड