शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपाच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:00 IST

महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे.

महाड : महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’, ‘अच्छे दिन लायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे’ असेच या सरकारचे धोरण आहे. मात्र, आपण सर्वांनी २०१९ हे वर्ष लक्षात ठेवायचे आहे. आम्ही तुमच्या मागे उभे राहू, तुम्ही जनतेच्या मागे ठामपणे उभे राहा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी महाड येथे कार्यकर्त्यांना केले.सरकारच्या जनहितविरोधी धोरणांच्या निषेधासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महाड येथे शनिवारी जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार शरद रणपिसे, आमदार हुस्नबानू खलपे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव जगताप, माजी आमदार मधूशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी देशातील सरकार हे शेतकºयांचे, कष्टकºयांचे, आदिवासींचे, दीन-दलितांचे सरकार नाही, तर ते केवळ भांडवलदारांचे हित पाहणारे सरकार आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे भले झाले आहे, असा एकही निर्णय गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या काळात केंद्र सरकारने घेतलेला नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये एकत्र आहेत, पण त्यांचे पटत नाही. पटत नाही, तरीही एकत्र आहेत. कारण ‘झगडा करेंगे, लेकीन मलाई भी खायेंगे’ असेच त्यांचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर चालत असल्याचा आरोप केला. शेतमालाला भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग भांडवलदारांच्या दबावापोटी लागू केला जात नाही, दोन कोटी नवे रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात नोकºया जाण्याची वेळ आली आहे. नोटाबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला चढविला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण