शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:00 IST

महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे.

महाड : महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे’, ‘अच्छे दिन लायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे’ असेच या सरकारचे धोरण आहे. मात्र, आपण सर्वांनी २०१९ हे वर्ष लक्षात ठेवायचे आहे. आम्ही तुमच्या मागे उभे राहू, तुम्ही जनतेच्या मागे ठामपणे उभे राहा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी महाड येथे कार्यकर्त्यांना केले.सरकारच्या जनहितविरोधी धोरणांच्या निषेधासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महाड येथे शनिवारी जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार शरद रणपिसे, आमदार हुस्नबानू खलपे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव जगताप, माजी आमदार मधूशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी देशातील सरकार हे शेतकºयांचे, कष्टकºयांचे, आदिवासींचे, दीन-दलितांचे सरकार नाही, तर ते केवळ भांडवलदारांचे हित पाहणारे सरकार आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे भले झाले आहे, असा एकही निर्णय गेल्या तीन-साडेतीन वर्षांच्या काळात केंद्र सरकारने घेतलेला नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये एकत्र आहेत, पण त्यांचे पटत नाही. पटत नाही, तरीही एकत्र आहेत. कारण ‘झगडा करेंगे, लेकीन मलाई भी खायेंगे’ असेच त्यांचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर चालत असल्याचा आरोप केला. शेतमालाला भाव मिळत नाही, स्वामिनाथन आयोग भांडवलदारांच्या दबावापोटी लागू केला जात नाही, दोन कोटी नवे रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात नोकºया जाण्याची वेळ आली आहे. नोटाबंदी आणि त्यानंतरच्या जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला चढविला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण