शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

आंदोलन करणे हा गुन्हा नाहीच- कोळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:43 IST

B.G. Kolse-Patil News : आंदोलनाचा नववा दिवस असून, प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवूनच आंदोलनाचा गोड शेवट हेच माझे उद्दिष्ट आहे व त्यासाठी ही शेवटची लढाई लढत आहे.

नागोठणे : लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, कायम, कंत्राटी तसेच निवृत्त कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार यांचे वतीने चालू करण्यात आलेल्या आंदोलनाचा रविवारी दहावा दिवस होता. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी शनिवारी आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.कोळसे-पाटील म्हणाले, आंदोलनाचा नववा दिवस असून, प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवूनच आंदोलनाचा गोड शेवट हेच माझे उद्दिष्ट आहे व त्यासाठी ही शेवटची लढाई लढत आहे. नोकरीनंतर १९९० सालापासून एन्रॉन, जैतापूरसह अनेक ठिकाणी आमच्या संघटनेकडून आंदोलने करून तेथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरलो आहोत. रिलायन्सच्या व्यवस्थापनाची मी भेट घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, एवढ्या वर्षांत आतापर्यंत कधीही कोणत्याही व्यवस्थापनाला भेटता आले नाही, हे माझे वैशिष्ट्य असून, रिलायन्स व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रश्नच उरत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.हा लढा जनशक्तीनेच सुटेल, असा विश्वास कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला. रिलायन्स व्यवस्थापन, तसेच सरकारी यंत्रणा या आंदोलनाकडे आजही डोळेझाक करीत आहे. आमचे म्हणणे एकच आहे की, प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली, तरच आमचे आंदोलन थांबेल. अहिंसेचा मार्ग न सोडता नाक दाबून तोंड कसे उघडायचे हे मला माहीत आहे. आंदोलन करणे हा गुन्हा नसून संविधानाने सर्वांना तो हक्क मिळवून दिला आहे.  

कराराला बांधिल३६ वर्षांपूर्वी तेव्हाच्या आयपीसीएल कंपनीत सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळेल, असा करार झाला होता. कालांतराने ही कंपनी केंद्राने रिलायन्स कंपनीला विकली, तरी ते करारापासून ते या कराराला ते बांधिल असल्याने प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी आमची संघटना लढत आहे व त्यात आम्ही यश मिळविणारच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Raigadरायगड