शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनास दहा वर्षे झाली, तरी वीट लागेना; नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:58 IST

सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

- विनोद भोईर पाली : सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००८ पासून २०१८ पर्यंतच्या कालावधीत तीन वेळा नारळ फोडण्याचा समारंभही उरकून घेण्यात आला. अखेर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी भूमिपूजन केले असता त्या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी डॉक्टर सावंत यांना या ग्रामीण रुग्णालयाचे तिसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे. मात्र, ही वास्तू तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर डॉक्टर सावंत यांनी बल्लाळेश्वर पावन भूमीतील या वास्तूचे काम पूर्ण करण्याची संधी मला दिली आहे. ते मी पूर्ण करणार, असा विश्वास दिला होता. मात्र, त्यांनीही याकडे आजवर लक्ष दिले नाही.

शासनाने निर्णय घेऊन तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली तरी ग्रामीण रुग्णालय झाले नसल्याने सुधागडातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या ग्रामीण रुग्णालयाचे तीन वेळा भूमिपूजन केले तरी आजवर वीट लागली नाही. तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत गरज आहे; कारण औद्योगिकीकरण हे मोठ्या प्रमाणात झाले असून, त्यांच्या तुलनेत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कुचकामी ठरत आहे.

आरोग्य केंद्राची झाली दयनीय अवस्था

१सध्या या केंद्राची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शासन नियमाप्रमाणे पूर्ण वेळ दोन डॉक्टर अपेक्षित असताना एकच डॉक्टर कार्यरत आहे. आॅपरेशन थिएटर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. आता त्याची अवस्था गोडाऊनसारखी झाली आहे.

२पावसाळ्यात ही इमारत जागोजागी गळत असते, कधीतरी रंगरंगोटी करून इमारत देखणी झाल्याचा आभास निर्माण केला जातो. कर्मचाऱ्यांना ही इमारत गैरसोयींची वाटू लागली आहे.

सुधागड तालुका हा आदिवासी तालुका आहे. येथे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात नाही. येथे मोलमजुरी करूनच लोक आपला उदरनिर्वाह करतात. येथील जिल्हा परिषद दवाखान्यात नेहमीच औषधांचा तुटवडा भासतो. मोठा आजार असल्यास किंवा अपघात झाल्यास मुंबई येथे रुग्णास हलवावे लागते. ही खर्चिक बाब असून ती न परवडणारी आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे.- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते.

पाली ग्रामीण रुग्णालयाचे २२ कोटी ४९ लाख १६ हजार ७०० रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.- डॉ. अजित गवळी, जिल्हा सहायक चिकित्सक

टॅग्स :Raigadरायगड