शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिवेआगर पर्यटनस्थळ आहे की डम्पिंग ग्राऊंड?, रस्त्यांसह नदी, नाले कचऱ्यामुळे भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:22 IST

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे.

- गणेश प्रभाळे

दिघी : देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटनस्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे दिवेआगर पर्यटनस्थळाचे आता विद्रुपीकरण होत आहे.

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. येथील स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे इथल्या पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

यासाठी रोजगाराच्या दृष्टीने सर्वत्र हॉटेल्स व होमस्टे व्यवसायांचे जाळे पसरले आहे. मात्र, यातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासुर येथील रस्ता, नदी, नाल्यात पाहायला मिळत आहे.

प्लास्टिकचा खचदिवेआगरचा समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहावा, सदैव पर्यटकांनी गजबजून जावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, पर्यटनस्थळाला जोडणारे बोर्लीपंचतन, भरडखोल व वाकडा पूल असे तीन मार्ग असून, या मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या असंख्य बाटल्यांचा खच पडला आहे. याच रस्त्यांच्या तिन्ही बाजूंना यशवंती खार परिसरात स्थानिकांच्या नियमित पीक घेणाऱ्या शेतजमिनी आहेत. मात्र, पर्यटकांना नेहमीच साद घालणाऱ्या या खाड्या, प्लास्टिक व कचरा, गाळाने भरल्या आहेत.

दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिल पाहिजे. अशाप्रकारे जर दुर्गंधी पसरली जात असेल तर पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कचरा टाकताना सापडल्यावर दंडात्मक कार्यवाही आतापर्यंत केली आहे; परंतु यापुढे जर कचरा टाकताना कोणी सापडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.- सिद्धेश कोजबे, सरपंच, दिवेआगर

टॅग्स :Raigadरायगड