शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर पर्यटनस्थळ आहे की डम्पिंग ग्राऊंड?, रस्त्यांसह नदी, नाले कचऱ्यामुळे भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:22 IST

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे.

- गणेश प्रभाळे

दिघी : देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटनस्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे दिवेआगर पर्यटनस्थळाचे आता विद्रुपीकरण होत आहे.

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. येथील स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे इथल्या पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

यासाठी रोजगाराच्या दृष्टीने सर्वत्र हॉटेल्स व होमस्टे व्यवसायांचे जाळे पसरले आहे. मात्र, यातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासुर येथील रस्ता, नदी, नाल्यात पाहायला मिळत आहे.

प्लास्टिकचा खचदिवेआगरचा समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहावा, सदैव पर्यटकांनी गजबजून जावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, पर्यटनस्थळाला जोडणारे बोर्लीपंचतन, भरडखोल व वाकडा पूल असे तीन मार्ग असून, या मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या असंख्य बाटल्यांचा खच पडला आहे. याच रस्त्यांच्या तिन्ही बाजूंना यशवंती खार परिसरात स्थानिकांच्या नियमित पीक घेणाऱ्या शेतजमिनी आहेत. मात्र, पर्यटकांना नेहमीच साद घालणाऱ्या या खाड्या, प्लास्टिक व कचरा, गाळाने भरल्या आहेत.

दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिल पाहिजे. अशाप्रकारे जर दुर्गंधी पसरली जात असेल तर पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कचरा टाकताना सापडल्यावर दंडात्मक कार्यवाही आतापर्यंत केली आहे; परंतु यापुढे जर कचरा टाकताना कोणी सापडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.- सिद्धेश कोजबे, सरपंच, दिवेआगर

टॅग्स :Raigadरायगड