शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये रेशन दुकानदाराकडून ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:37 IST

एकीकडे अन्न नागरी पुरवठामंत्री रेशन दुकानदारांनी गैरकारभार केल्यास तथा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देताना कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काही रेशन दुकानदार गोरगरिबांची पिळवणूक करीत आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील टेंभरे गावात रेशन दुकानदाराकडून गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यात येत आहे. धान्य कमी दिल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, येथील दुकानचालक एक महिला असूनही महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याने रेशन दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका विनंती अर्जाद्वारे केली आहे.एकीकडे अन्न नागरी पुरवठामंत्री रेशन दुकानदारांनी गैरकारभार केल्यास तथा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देताना कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काही रेशन दुकानदार गोरगरिबांची पिळवणूक करीत आहेत. याचसंदर्भात अनेक तक्रारी तहसीलदार कार्यालयात करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून, प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ तसेच नियमित दरमहा मिळणारे धान्य रेशन दुकानदारांच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील काही दुकानदार आपत्तीकाळातही धान्यवाटपात गैरव्यवहार करून गरीब गरजूंना लाभापासून वंचित ठेवत असल्याचे समोर येत आहे.कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेंभरे गावातील महिला हिराबाई अशोक जाधव व कुंदा रमेश जाधव धान्य आणण्यासाठी एक बचतगटाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या रेशनिंग दुकानात गेल्या होत्या. या वेळी महिला दुकानदाराने शिवीगाळ करीत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच गावासमोर तक्रारदार महिलेस अपमानित केले. दुकानधारकाकडून नेहमीच धान्यवाटपात अनियमितता केली जाते, लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. प्रतिकुटुंब मिळणारे धान्यही कमी दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.दुकानदाराकडून कधीही पूर्ण धान्य दिले जात नाही, याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण केली जाते. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वीटेंभरे आदिवासीवाडीतील काशीनाथ वाघमारे व अनंता मुरकुटे यांच्याबाबतीत घडला होता.कधीही पूर्ण धान्य मिळत नाहीटेंभरे गावातील रेशनिंग दुकानदार मनमानी करत असून कधीच धान्य पूर्ण देत नाही, त्याची पावतीही देत नाही. याबाबत सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. धान्य कमी दिल्याबाबत विचारणा केल्यास शिवीगाळ करून अपमानित करण्यात येते. या प्रकरणी सर्व ग्रामस्थांनी तहसीलकडे तक्रार अर्ज केला असल्याचे ग्रामस्थ अशोक बाबू जाधव याने सांगितले.बचतगटातर्फे चालवण्यात येणारे रेशन दुकान महिला बचतगटाच्या नावे असले तरी दुकान गटातीलच मंदा विनायक भोईर व त्यांचा मुलगा चालवत आहे. गटातील इतर महिलांना सदस्यांना कधीही विचारात घेतले जात नाही. कोणत्याही प्रकारचा आर्थिक हिशोब दिला जात नाही. ते आपलीच मनमानी करतात.- नीरा तानाजी देशमुख, बचतगट सदस्या, टेंभरेटेंभरे येथील रेशन दुकानासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. याची चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत

टॅग्स :Karjatकर्जत