शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्यावृद्धीसाठी अभिनव उपक्रम

By admin | Updated: June 15, 2017 02:38 IST

‘होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, मग तुम्ही का नाही’ अशा अनोख्या आवाहन अभियानाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ‘होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, मग तुम्ही का नाही’ अशा अनोख्या आवाहन अभियानाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हाती घेतले आहे. या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्र म, शिक्षणाचा दर्जा, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांना देण्यात येत आहे. त्याचबरोबरच जि.प. शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम बहुदा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.रायगड जिल्ह्यातील पालकांना स्वस्वाक्षरीचे पत्र देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा दाखलाच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर देत आहेत. प्रिय पालकांनो, तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवा. आपली जिल्हा परिषद शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कोठेही कमी नाही. किंबहुना ती अधिक सोयीयुक्त आहे असे आवाहन करणारा हा एक आगळावेगळा उपक्र म या वर्षापासून जि.प.च्या माध्यमातून नार्वेकरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी शेषराव बडे राबवित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी लिहिलेले हे पत्र वाचले असता निश्चितच या उपक्र माचे महत्व व त्यामागे असलेली भावना लक्षात येते. अशा प्रकारचे उपक्र म जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवून रायगड जिल्ह्यातील पालकांमध्ये जागृती होवून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल, असा विश्वास जि .प च्या शिक्षण विभागाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्रआपली मुलं हीच खरं तर आपली संपत्ती! त्यांच्यासाठी आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करीत आहात. आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं पर्यायाने देशाचंं नाव मोठं करावं असं आपलंही स्वप्न असेल ना? हे स्वप्न निश्चित साकार होईल. मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करायला हवी. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य आहे हे शिक्षणतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर पोहचलेले असंख्य अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, खेळाडू, इंजिनीअर्स, कलाकार, साहित्यिक, लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रात नमूद के ले.