शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्यावृद्धीसाठी अभिनव उपक्रम

By admin | Updated: June 15, 2017 02:38 IST

‘होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, मग तुम्ही का नाही’ अशा अनोख्या आवाहन अभियानाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ‘होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, मग तुम्ही का नाही’ अशा अनोख्या आवाहन अभियानाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हाती घेतले आहे. या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्र म, शिक्षणाचा दर्जा, देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती पालकांना देण्यात येत आहे. त्याचबरोबरच जि.प. शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम बहुदा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.रायगड जिल्ह्यातील पालकांना स्वस्वाक्षरीचे पत्र देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा दाखलाच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर देत आहेत. प्रिय पालकांनो, तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवा. आपली जिल्हा परिषद शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कोठेही कमी नाही. किंबहुना ती अधिक सोयीयुक्त आहे असे आवाहन करणारा हा एक आगळावेगळा उपक्र म या वर्षापासून जि.प.च्या माध्यमातून नार्वेकरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी शेषराव बडे राबवित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी लिहिलेले हे पत्र वाचले असता निश्चितच या उपक्र माचे महत्व व त्यामागे असलेली भावना लक्षात येते. अशा प्रकारचे उपक्र म जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवून रायगड जिल्ह्यातील पालकांमध्ये जागृती होवून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल, असा विश्वास जि .प च्या शिक्षण विभागाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्रआपली मुलं हीच खरं तर आपली संपत्ती! त्यांच्यासाठी आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करीत आहात. आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं पर्यायाने देशाचंं नाव मोठं करावं असं आपलंही स्वप्न असेल ना? हे स्वप्न निश्चित साकार होईल. मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करायला हवी. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य आहे हे शिक्षणतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर पोहचलेले असंख्य अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, खेळाडू, इंजिनीअर्स, कलाकार, साहित्यिक, लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रात नमूद के ले.