शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

छतांचा रहिवासी वापर ठरतोय धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:13 IST

भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी आगीच्या घटना घडत असल्याने भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील घरभाड्याच्या रकमेतही कमालीची वाढ झाली आहे. यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून देखील अनेकांनी बैठ्या चाळीतल्या तसेच गावठाणातील घरांची पुनर्बांधणी करून छताची जागा भाड्याने देण्याला सुरवात केली आहे. ४ ते ६ हजार रुपये महिना भाड्याने हे टेरेस दिले जात आहेत, तर काही सोसायटीधारकांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबासाठी टेरेसचा वापर खुला केला आहे. परंतु छतांचा रहिवासी वापर भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच घटना सोमवारी दुपारी तुर्भे सेक्टर २२ येथे घडली. वेळीच आगीवर नियंत्रण आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.काही अंतरावरच असलेल्या तीन इमारतींच्या छताचा रहिवासी वापर केला जात होता. त्यापैकी एका छतावर लागलेली आग पसरल्याने तीनही इमारतींच्या छतावर अग्नितांडव सुरू झाले होते. यावेळी प्लॅस्टिकची पाण्याची टाकी वितळल्याने त्यातल्या पाण्यामुळे काही प्रमाणात आग पसरण्याचे थांबले. शिवाय वेळीच अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र या घटनेवरून छतांवरील रहिवासी वास्तव्याला धोक्याची घंटा मिळाली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात छतांचा रहिवासी वापर होत असतानाही, सर्वच प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उद्भवत आहे. काही ठिकाणी कॅटरिंगच्या व्यवसायाकरिता स्वयंपाक करण्यासाठी छतांचा वापर होत आहे. पावसाचे पाणी छतामधून पाझरू नये या कारणाखाली बहुतांश छतांवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या शेडखाली चाललंय काय याचा शोध घेण्याचाही प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून झालेला नाही. दारूच्या खासगी पार्ट्या, जुगाराचा अड्डा यासाठी देखील छत वापरले जात आहेत.अशा काही ठिकाणांवर पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंबंधीची चौकशी देखील सुरू केली होती. मुंढेंच्या बदलीनंतर मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुनर्बांधणी अथवा गरजेपोटीच्या नावाखाली व्हर्टिकल बांधकामे वाढत आहेत. जास्त जागा व्यापण्यासाठी पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर इमारतींचा आकार बदलला जात आहे. यामुळे एकाला एक चिटकून इमारती उभ्या राहत असल्याने एखाद्या दुर्घटनेत त्याठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची सुटका करणे अथवा अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोचणे अडचणीचे ठरणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड