शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

छतांचा रहिवासी वापर ठरतोय धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:13 IST

भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : भाडोत्री स्वस्तात घराची मागणी करीत असल्याने अनेकांनी इमारतींच्या छतांचा रहिवासी वापर करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरात बहुतांश बैठ्या चाळीतली नव्याने बांधलेली घरे, रो हाऊस यासह इमारतींच्या छतावर वाढीव बांधकाम केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी आगीच्या घटना घडत असल्याने भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील घरभाड्याच्या रकमेतही कमालीची वाढ झाली आहे. यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून देखील अनेकांनी बैठ्या चाळीतल्या तसेच गावठाणातील घरांची पुनर्बांधणी करून छताची जागा भाड्याने देण्याला सुरवात केली आहे. ४ ते ६ हजार रुपये महिना भाड्याने हे टेरेस दिले जात आहेत, तर काही सोसायटीधारकांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबासाठी टेरेसचा वापर खुला केला आहे. परंतु छतांचा रहिवासी वापर भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच घटना सोमवारी दुपारी तुर्भे सेक्टर २२ येथे घडली. वेळीच आगीवर नियंत्रण आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.काही अंतरावरच असलेल्या तीन इमारतींच्या छताचा रहिवासी वापर केला जात होता. त्यापैकी एका छतावर लागलेली आग पसरल्याने तीनही इमारतींच्या छतावर अग्नितांडव सुरू झाले होते. यावेळी प्लॅस्टिकची पाण्याची टाकी वितळल्याने त्यातल्या पाण्यामुळे काही प्रमाणात आग पसरण्याचे थांबले. शिवाय वेळीच अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र या घटनेवरून छतांवरील रहिवासी वास्तव्याला धोक्याची घंटा मिळाली आहे.शहरात मोठ्या प्रमाणात छतांचा रहिवासी वापर होत असतानाही, सर्वच प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उद्भवत आहे. काही ठिकाणी कॅटरिंगच्या व्यवसायाकरिता स्वयंपाक करण्यासाठी छतांचा वापर होत आहे. पावसाचे पाणी छतामधून पाझरू नये या कारणाखाली बहुतांश छतांवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या शेडखाली चाललंय काय याचा शोध घेण्याचाही प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून झालेला नाही. दारूच्या खासगी पार्ट्या, जुगाराचा अड्डा यासाठी देखील छत वापरले जात आहेत.अशा काही ठिकाणांवर पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. गतवर्षी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंबंधीची चौकशी देखील सुरू केली होती. मुंढेंच्या बदलीनंतर मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुनर्बांधणी अथवा गरजेपोटीच्या नावाखाली व्हर्टिकल बांधकामे वाढत आहेत. जास्त जागा व्यापण्यासाठी पहिल्या अथवा दुसºया मजल्यावर इमारतींचा आकार बदलला जात आहे. यामुळे एकाला एक चिटकून इमारती उभ्या राहत असल्याने एखाद्या दुर्घटनेत त्याठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची सुटका करणे अथवा अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोचणे अडचणीचे ठरणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड