शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2015 23:27 IST

पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे.

कर्जत : पाऊस सतत विश्रांती घेत असल्याने शेतकरी पाऊस सुरु झाल्यापासून चिंतेत आहे. आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम भातपिकावर जाणवू लागला आहे. कारण खडकाळ आणि मुरमाड जमिनीमधील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने भाताचे पीक हातात येण्याची शक्यता कमी झाली आहे.कर्जत तालुक्यात सध्या पावसाळ्यात दहा हजार हेक्टर जमिनीमध्ये भाताची शेती करण्यात आली आहे. परंतु पावसाने तीन महिन्याच्या काळात नियमितपणा ठेवला नाही. त्यामुळे शेते कोरडी पडली आहे. यावर्षी जेमतेम १८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या संकटात भर म्हणून की काय आता शेतातील भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. कारण भाताचे पीक आता कोंब येण्याचे स्थितीत असताना रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. कळंब , ओलमण, बोरगाव, खांडस आदी भागातील भाताच्या पिकावर सध्या बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. या रोगाची कीड ही कोंबीमध्ये घुसून भाताचा चुड खराब करते आणि नंतर त्याचा फैलाव संपूर्ण शेतात होतो, वातावरणामध्ये जोरात हवा असेल तर त्या किडी आणि कीटक हे बाजूच्या शेतातील भाताच्या पिकाला आपले लक्ष्य करतात. बगळ्या आणि अन्य तत्सम रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने कृषी विभागाच्या कृषी सहायकांचा सल्ला घेण्याचे आवाहन कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी केले आहे. शेत कोरडे पडले तर किडी आणि भुंगे यांना भाताच्या पिकावर हल्ला करण्याची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)