शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील आंब्याच्या झाडांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:00 IST

श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या ...

श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या कीटकांमुळे आंब्याच्या फुलांना आणि पानाला धोका निर्माण होत आहे.

तुडतुड्या कीटक फुलातील व पानातील रस शोषून घेतात, त्याकारणास्तव आंब्याची पाने व येणारा मोहोर कमी प्रमाणात येतो. तुडतुड्या कीटक पानांच्या पाठीमागील भागात वास्तव्य करतात. तुडतुडे अतिशय चंचल व एका पानावरून दुसऱ्या पानावर सदैव भ्रमंती करतात. थंडीच्या कालावधीमध्ये सुप्तावस्थेत असतात. मात्र, थंडीचे थोडे प्रमाण कमी झाल्यास ते पूर्ण क्षमतेने पानातील रस शोषून घेतात. योग्य उपाययोजना न केल्यास आंब्याची पाने पिवळी पडल्यानंतर काही अंशी गळण्यास सुरुवात होते.

कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी अगोदरच त्रासलेला आहे. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील शेकडो हेक्टर पिके जमीनदोस्त केली. अनेक वर्षांपासून शेतकऱ्याला आंब्याच्या पिकाद्वारे उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास अंदाजे ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आंब्याची झाडे वादळात नुकसानग्रस्त झाली आहेत. उर्वरित आंबा कसाबसा वादळापासून वाचला आहे. उभ्या असलेल्या आंब्यालासुद्धा वादळाचा बऱ्याच अंशी फटका बसला आहे. अशा कठीण प्रसंगी आंब्याकडून आगामी काळात उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. कीटकाचा वाढलेला प्रादुर्भाव चिंता वाढवणारा आहे.

टॅग्स :Raigadरायगड