शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकरणाचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:16 IST

पर्यावरणाची हानी : रायगड जिल्ह्यात जल आणि वायू प्रदूषणाचा गंभीर प्रश्न

आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पूर्वी भाताचे कोठार असणाऱ्या रायगड जिल्ह्याची ओळख आता वाढत्या औद्योगिकीकरणामुळे बदलली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने उद्योगांचे जाळे उभारण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केमिकल निर्मितीच्या उद्योगांचा भरणा अधिक असल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेतांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. येथील नागरिकांचे प्रामुख्याने शेती आणि मासेमारी हे दोनच व्यवसाय होते. मोठ्या प्रमाणात असलेली शेती आणि त्या माध्यमातून उत्पादन होणाºया भाताचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याने जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ म्हटले जायचे. त्याचप्रमाणे मासेमारी करून आपला उदरनिर्वाह सुरू होता. कालांतराने जिल्ह्यातील सपाट आणि सुपीक जमीन धोरणकर्त्यांच्या नजरेतून लपून राहिली नाही. त्यांनी या ठिकाणी उद्योगांचे जाळे उभारले. जिल्ह्यामध्ये तळोजा, अलिबाग, रोहा, माणगाव, विळेभागाड, महाड एमआयडीसी उभारण्यात आल्या. नवरत्न कंपन्यांपैकी एचओसीएल, आरसीएफ, गेल, आपीसीएस, ओएनजीसीसारख्या कंपन्या याच ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केमिकल निर्मितीच्या कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्याने याच कंपन्यांमधून प्रदूषणाचा मोठा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. वायू आणि जलप्रदूषणाने सर्वाधिक डोके वर काढले आहे.वायुप्रदूषणामुळे कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन अधिक वेगाने होत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध शारीरिक व्याधी जडल्या आहेत. तर दुसरीकडे केमिकल कंपन्यांच्या माध्यमातून निघणाºया सांडपाण्यावर कोणतीच प्रक्रिया न करता ते थेट समुद्र, खाडी, नदी पात्रात सोडण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे वनस्पती, सूक्ष्म जीव, मासे अशा पर्यावरणातील अनेक प्रमुख घटकांवर आघात होत आहे.सन 2000 ची स्थिती1. या कालावधीत उद्योगांची, कारखान्यांची संख्या मर्यादित होती.2. कारखाने कमी प्रमाणात असल्याने नद्या, खाडी, समुद्र यांचे प्रदूषणही कमी होते, त्यामुळे पयावरण संतुलित राहते.3. जलस्रोत असलेल्या नदी, वहिरींचे प्रदूषित होण्याचे प्रमाण नगण्य असल्याने पिण्यासाठी पाणी शुद्ध होते.4. प्रदूषण कमी असल्याने समुद्र, खाडी, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय तेजीत होता.5. श्वसनाचे विकार, शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाणही अतिशय कमी होते. मुळात वातावरण शुद्ध असल्यामुळे मानवी आरोग्य सुदृढ होते.सध्याची स्थिती1. या कालावधीमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.2. वाढता विकास, उद्योगामुळे प्रदूषण वाढले आहे.3. सांडपाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभावआहे4. खाडी, समुद्रामध्ये कमी अंतरावर मासेमारी करावी लागते. मात्र आता ८० किमी आत जाऊनसुद्धा मासे कमी प्रमाणातमिळत आहेत.5. वाढत्या प्रदूषणामुळे विविध व्याधींचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये कॅन्सर, दमा, डोकेदुखी, डोळ्यांची आग होणे, बहिरेपणा यांचा समावेश आहे.पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीतकमी करून जगावे.2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावरकाय परिणाम होणार आहे याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.