शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी भारतीय सेना सज्ज- सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:51 IST

देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे.

श्रीवर्धन : देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे. सागरी सुरक्षेसाठी जनतेने नियमाचे पालन करत नौसेनेला सहकार्य करावे. आपणा सर्वांच्या दक्षतेमुळे देशाच्या विविध भागांतील सागरी सीमा बळकट झाल्या आहेत, असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर सलमान खान यांनी केले.श्रीवर्धन पोलीस व भारतीय नौसेना यांच्या संयुक्तिक सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन शेखाडी येथे करण्यात आले होते. सलमान खान यांनी या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी मुक्तपणे संवाद साधला. सागरी सुरक्षेतील जनतेच्या भूमिकेचे महत्त्व, जनतेच्या अडी अडचणी व समस्या, नौसेनेचे दायित्व, नौसेनेची कार्यपद्धती, दहशती हल्ले आणि सामान्य व्यक्ती या विषयी सलमान खान यांनी मार्मिक मार्गदर्शन केले.सलमान खान यांनी सागरी सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क असणे गरजेचे आहे. सागरी मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे त्याचा फायदा आपण आपल्या सुरक्षेसाठी करा. आपल्या सागरी हद्दीत कुठेही अपरिचित बोट अथवा जहाज आढळल्यास तात्काळ नौसेना, स्थानिक पोलीस ठाणे व सागरी सुरक्षा रक्षकांना त्यांची कल्पना द्या. आपल्या हद्दीत इतर परकीय घटकांची घुसखोरी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे असे खान यांनी सांगितले. नौसेनेला सामान्य माणसाची मदत मिळाल्यास कोणताही अनुचित प्रकार कदापि घडणार नाही.सागरी भागातील प्रत्येक मच्छीमार देशाचा सैनिक आहे. भारतीय सेना देशातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे असे सलमान खान यांनी सांगितले. यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी उपस्थित जनतेस सहकार्याचे आवाहन केले. या चर्चासत्रात नौसेनेचे सुमित कुमार, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जयेंद्र पेडव, उपपोलीस निरीक्षक एच. एल. पाटील , ओएनजीसीचे स्वप्निल ठाकूर, शेखाडी, आरावी, कोंडविल, भरडखोल येथील नागरिक उपस्थित होते .