शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी भारतीय सेना सज्ज- सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:51 IST

देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे.

श्रीवर्धन : देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे. सागरी सुरक्षेसाठी जनतेने नियमाचे पालन करत नौसेनेला सहकार्य करावे. आपणा सर्वांच्या दक्षतेमुळे देशाच्या विविध भागांतील सागरी सीमा बळकट झाल्या आहेत, असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर सलमान खान यांनी केले.श्रीवर्धन पोलीस व भारतीय नौसेना यांच्या संयुक्तिक सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन शेखाडी येथे करण्यात आले होते. सलमान खान यांनी या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी मुक्तपणे संवाद साधला. सागरी सुरक्षेतील जनतेच्या भूमिकेचे महत्त्व, जनतेच्या अडी अडचणी व समस्या, नौसेनेचे दायित्व, नौसेनेची कार्यपद्धती, दहशती हल्ले आणि सामान्य व्यक्ती या विषयी सलमान खान यांनी मार्मिक मार्गदर्शन केले.सलमान खान यांनी सागरी सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क असणे गरजेचे आहे. सागरी मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे त्याचा फायदा आपण आपल्या सुरक्षेसाठी करा. आपल्या सागरी हद्दीत कुठेही अपरिचित बोट अथवा जहाज आढळल्यास तात्काळ नौसेना, स्थानिक पोलीस ठाणे व सागरी सुरक्षा रक्षकांना त्यांची कल्पना द्या. आपल्या हद्दीत इतर परकीय घटकांची घुसखोरी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे असे खान यांनी सांगितले. नौसेनेला सामान्य माणसाची मदत मिळाल्यास कोणताही अनुचित प्रकार कदापि घडणार नाही.सागरी भागातील प्रत्येक मच्छीमार देशाचा सैनिक आहे. भारतीय सेना देशातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे असे सलमान खान यांनी सांगितले. यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी उपस्थित जनतेस सहकार्याचे आवाहन केले. या चर्चासत्रात नौसेनेचे सुमित कुमार, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जयेंद्र पेडव, उपपोलीस निरीक्षक एच. एल. पाटील , ओएनजीसीचे स्वप्निल ठाकूर, शेखाडी, आरावी, कोंडविल, भरडखोल येथील नागरिक उपस्थित होते .