शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

पनवेलमध्ये रिक्षांच्या वाढत्या संख्येचा ताप; तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:29 IST

रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

- वैभव गायकरपनवेल : रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून, रिक्षाचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने १७ जून २०१७ रोजी रिक्षा परवाने खुले केले आहेत. शासनाच्या या धोरणामुळे मागील दोन वर्षांत रिक्षांच्या संख्येत अनियंत्रितपणे वाढ झाली आहे. सध्या पनवेल तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा रस्त्यावर धावतात. साधारणपणे दिवसाला पाच ते सहा नवीन रिक्षा रस्त्यावर उतरत आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने व्यवसायावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. शिवाय वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे. विशेष म्हणजे, खुले परमिट धोरण विविध कारणांमुळे गैयसोयीचे ठरले असतानाही शासनाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. परिणामी, आता पनवेल तालुक्यातील रिक्षा संघटनांनीच या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पनवेलसह खारघरमधील विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी पनवेल परिवहनचे आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांची भेट घेऊन रिक्षांचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करण्याची मागणी केली.खुल्या परिमट धोरणामुळे अनेक धनदांडग्यांनी परमिट मिळवून रिक्षा भाडेतत्त्वावर इतरांना चालवायला दिल्यात. त्यामुळे रिक्षा चालविणाऱ्या मूळ रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. पनवेल सारख्या शहरात रिक्षा स्टॅण्ड उभारण्यासाठी जागा शिल्लक नाही. यातच रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.शासनाचे निर्देश असल्याने या संदर्भात परिवहन विभागही हतबल असल्याचे दिसून येते. पनवेल तालुक्यात खारघर, कामोठे आदी ठिकाणी हद्दीचा वाद आहे. रिक्षा संघटनांच्या आपापसातील वादामुळे अनेक वेळा रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच वादामुळे गेल्या वर्षभरात खारघर विभागातील रिक्षा संघटनांनी १५ दिवसांपेक्षा जास्त काळ रिक्षा सेवा बंद ठेवली आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवासीवर्गाला बसत आहे.रिक्षांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, हाच यावर तोडगा असल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्षांचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा तीव्र आंदोलनअद्याप परिवहन विभागातर्फे शहरात स्टॅण्डची जागाही निश्चित करण्यात आली नाही. त्यातच खुले परिमट धोरणानुसार मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा रस्त्यांवर उतरत आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. तसेच वर्षानुवर्षे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांच्या दैनंदिन व्यवसावरही याचा परिणाम होताना दिसत आहे. या संदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा परिवहन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खारघर येथील एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांनी दिला आहे.खुले रिक्षा परवाने बंद करण्यासंदर्भात रिक्षा संघटनांचे निवेदन प्राप्त झाले आहे. सध्याच्या घडीला दिवसातून पाच ते सहा रिक्षा परवाने दररोज वितरित केले जात आहेत. रिक्षा परवाने वितरित करण्याचा निर्णय शासनाचा आहे.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल