शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

पनवेलमध्ये रिक्षांच्या वाढत्या संख्येचा ताप; तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:29 IST

रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

- वैभव गायकरपनवेल : रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून, रिक्षाचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने १७ जून २०१७ रोजी रिक्षा परवाने खुले केले आहेत. शासनाच्या या धोरणामुळे मागील दोन वर्षांत रिक्षांच्या संख्येत अनियंत्रितपणे वाढ झाली आहे. सध्या पनवेल तालुक्यात जवळपास १४ हजार रिक्षा रस्त्यावर धावतात. साधारणपणे दिवसाला पाच ते सहा नवीन रिक्षा रस्त्यावर उतरत आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने व्यवसायावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. शिवाय वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे. विशेष म्हणजे, खुले परमिट धोरण विविध कारणांमुळे गैयसोयीचे ठरले असतानाही शासनाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. परिणामी, आता पनवेल तालुक्यातील रिक्षा संघटनांनीच या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पनवेलसह खारघरमधील विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी पनवेल परिवहनचे आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांची भेट घेऊन रिक्षांचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करण्याची मागणी केली.खुल्या परिमट धोरणामुळे अनेक धनदांडग्यांनी परमिट मिळवून रिक्षा भाडेतत्त्वावर इतरांना चालवायला दिल्यात. त्यामुळे रिक्षा चालविणाऱ्या मूळ रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. पनवेल सारख्या शहरात रिक्षा स्टॅण्ड उभारण्यासाठी जागा शिल्लक नाही. यातच रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.शासनाचे निर्देश असल्याने या संदर्भात परिवहन विभागही हतबल असल्याचे दिसून येते. पनवेल तालुक्यात खारघर, कामोठे आदी ठिकाणी हद्दीचा वाद आहे. रिक्षा संघटनांच्या आपापसातील वादामुळे अनेक वेळा रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच वादामुळे गेल्या वर्षभरात खारघर विभागातील रिक्षा संघटनांनी १५ दिवसांपेक्षा जास्त काळ रिक्षा सेवा बंद ठेवली आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवासीवर्गाला बसत आहे.रिक्षांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, हाच यावर तोडगा असल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्षांचे खुले परमिट धोरण तत्काळ बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा तीव्र आंदोलनअद्याप परिवहन विभागातर्फे शहरात स्टॅण्डची जागाही निश्चित करण्यात आली नाही. त्यातच खुले परिमट धोरणानुसार मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा रस्त्यांवर उतरत आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. तसेच वर्षानुवर्षे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांच्या दैनंदिन व्यवसावरही याचा परिणाम होताना दिसत आहे. या संदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा परिवहन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खारघर येथील एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांनी दिला आहे.खुले रिक्षा परवाने बंद करण्यासंदर्भात रिक्षा संघटनांचे निवेदन प्राप्त झाले आहे. सध्याच्या घडीला दिवसातून पाच ते सहा रिक्षा परवाने दररोज वितरित केले जात आहेत. रिक्षा परवाने वितरित करण्याचा निर्णय शासनाचा आहे.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल