शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रमजानने वाढविला फळांचा भाव

By निखिल म्हात्रे | Updated: March 22, 2024 11:55 IST

विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - उन्हाळ्यासह आता रमजान महिन्यालाही सुरुवात झाल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात फळांची आवक वाढली आहे. मागणी वाढल्याने पर्यायाने फळांच्या दरातही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

यावर्षी उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाला आहे. तडाखा वाढू लागल्यापासून फळांना मागणी वाढली आहे. फळांचे रस तयार करण्यासाठीही फळांना मागणी आहे. त्यातच रमझान हा उपवासाचा महिना सुरू झाल्यामुळे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारात सध्या कलिंगडची मोठी आवक दररोज होत आहे तर, टरबूज, पपईच्याही अनेक गाड्या दररोज येत आहेत. कलिंगडच्याही शुगर किंग, नामधारी या दोन्ही जातींच्या कलिंगडाची आवक आता होऊ लागली आहे. द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारात गोड द्राक्षे येत आहेत आणि त्यांचे दरही स्थिर आहेत. रमजानमुळे द्राक्षांनाही मागणी आहे.

आठवड्याभरापूर्वी पर्यंत घाऊक फळ बाजारात आठ ते दहा रुपये किलोपर्यंत असलेली कलिंगडे आता १५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहेत. तर, खरबुजाचे दरही १० ते १२ रुपये किलोपासून २५ रुपये किलो झाले आहेत. द्राक्षांचे दरही ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. अननसही ५० ते ६० रुपये एक नग या प्रमाणे विकले जात आहेत. पपईही १५ ते २० रुपये किलो झाली आहेत. काही फळांच्या दरात दुप्पट तर, काहींच्या २० ते ३० टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती फळ व्यापार्‍यांनी दिली. तसेच, किरकोळ बाजारात द्राक्षे १०० ते १२० रुपये किलो, डाळिंब १८० ते २०० रुपये किलो, कलिंगड ३० ते ४० रुपये किलो, टरबूज ३० ते ४० रुपये किलो तर, सफरचंद १५० ते २०० रुपये किलो झाली आहेत. अननस ७० ते ८० रुपये नग या प्रमाणे विकली जात आहेत. दरम्यान, महिनाभर फळांची दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाज असून या उन्हाळ्यात फळांसाठी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

 

टॅग्स :alibaugअलिबाग