शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

रमजानने वाढविला फळांचा भाव

By निखिल म्हात्रे | Updated: March 22, 2024 11:55 IST

विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - उन्हाळ्यासह आता रमजान महिन्यालाही सुरुवात झाल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात फळांची आवक वाढली आहे. मागणी वाढल्याने पर्यायाने फळांच्या दरातही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

यावर्षी उन्हाचा तडाखा लवकर सुरू झाला आहे. तडाखा वाढू लागल्यापासून फळांना मागणी वाढली आहे. फळांचे रस तयार करण्यासाठीही फळांना मागणी आहे. त्यातच रमझान हा उपवासाचा महिना सुरू झाल्यामुळे कलिंगड, टरबूज, अननस, पपई यांसारख्या रसदार फळांना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारात सध्या कलिंगडची मोठी आवक दररोज होत आहे तर, टरबूज, पपईच्याही अनेक गाड्या दररोज येत आहेत. कलिंगडच्याही शुगर किंग, नामधारी या दोन्ही जातींच्या कलिंगडाची आवक आता होऊ लागली आहे. द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारात गोड द्राक्षे येत आहेत आणि त्यांचे दरही स्थिर आहेत. रमजानमुळे द्राक्षांनाही मागणी आहे.

आठवड्याभरापूर्वी पर्यंत घाऊक फळ बाजारात आठ ते दहा रुपये किलोपर्यंत असलेली कलिंगडे आता १५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहेत. तर, खरबुजाचे दरही १० ते १२ रुपये किलोपासून २५ रुपये किलो झाले आहेत. द्राक्षांचे दरही ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. अननसही ५० ते ६० रुपये एक नग या प्रमाणे विकले जात आहेत. पपईही १५ ते २० रुपये किलो झाली आहेत. काही फळांच्या दरात दुप्पट तर, काहींच्या २० ते ३० टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती फळ व्यापार्‍यांनी दिली. तसेच, किरकोळ बाजारात द्राक्षे १०० ते १२० रुपये किलो, डाळिंब १८० ते २०० रुपये किलो, कलिंगड ३० ते ४० रुपये किलो, टरबूज ३० ते ४० रुपये किलो तर, सफरचंद १५० ते २०० रुपये किलो झाली आहेत. अननस ७० ते ८० रुपये नग या प्रमाणे विकली जात आहेत. दरम्यान, महिनाभर फळांची दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाज असून या उन्हाळ्यात फळांसाठी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

 

टॅग्स :alibaugअलिबाग