शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सागरी चाचांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे फळांच्या निर्यातीसह दरांवर परिणाम; व्यापारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:04 IST

बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घसरला

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: सागरी चाचांच्या हल्ल्यांमुळे  ऐन रमजानच्या सणातच भारतीय विविध बंदरातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराचा असलेल्या तांबडा समुद्राला (रेड सी) मोठा वळसा घालून मालवाहू जहाजांना प्रवास करावा लागत असल्याने जहाजांच्या सर्व प्रकारच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सागरी मार्गावरील होणाऱ्या मालाच्या आयात-निर्यातीचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत घटले असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आशिया, आफ्रिका, युरोप खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराच्या तांबड्या समुद्रातून विविध देशांतील रोज शेकडो मालवाहू जहाजे विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करतात. मालवाहू जहाजांसाठी तांबडा समुद्र आयात-निर्यातीसाठी कमी अंतरामुळे अत्यंत उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो; मात्र या समुद्रातील जहाजांवर झालेल्या सागरी चाचांच्या  हल्ल्यांमुळे जहाज वाहतूक पुरती कोलमडली असून ठप्प झाली आहे. याचा विपरीत परिणाम या सागरी मार्गावरुन होणाऱ्या आयात-निर्यात करणाऱ्या मालवाहू जहाजांवर झाला आहे. 

धोका टाळण्यासाठी तांबड्या समुद्रातील प्रवास टाळून मालवाहू जहाजांना अन्य सागरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. इच्छित बंदरापर्यंत माल पोहोचविण्यासाठी २० ते ३० दिवसांपर्यंत विलंब होत आहे. वेळ, खर्च वाढला असल्यामुळे कंपन्यांनी जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये वाढ केली आहे.

मालवाहू जहाजांच्या भाडेदरांमध्ये केलेली दरवाढ नाईलाजाने करावी लागली असल्याचे शिपिंग कंपन्यांकडून सांगितले जात आहे; मात्र मालवाहू करणाऱ्या जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरात वाढ झाल्याने विविध बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे.-राहुल पवार, मालक, स्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट-इंपोर्ट कंपनी

रमजानमध्ये भारतीय बंदरांतून युरोप, अमेरिकेमध्ये विशेषतः महाराष्ट्रातून द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, आंबा आणि इतर विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात, मात्र या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.-इरफान मेनन, मालक बच्चूभाई ॲण्ड कंपनी

फळांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

अनेक निर्यातदार कंपन्यांनी आखाती देशांमध्ये वेळेवर फळे पोहोचविण्यासाठी विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे; मात्र मुबलक कार्गो स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमान कंपन्यांनीही दुपटीने दरवाढ केली असल्याचेही निर्यातदारांकडून सांगितले जात आहे. जहाजांना मार्ग बदलावा लागल्याने वाहतूक २० ते ३० दिवसांनी वाढली आहे. शेतीमाल वेळेत दाखल होत नसल्याने निर्यातदारांचे नुकसान होत आहे. तर निर्यातदारांनी फळांची खरेदीच कमी केल्याने निर्यात होणाऱ्या फळांचे दरही कमी होत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :uran-acउरण