शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सागरी चाचांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे फळांच्या निर्यातीसह दरांवर परिणाम; व्यापारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:04 IST

बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घसरला

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: सागरी चाचांच्या हल्ल्यांमुळे  ऐन रमजानच्या सणातच भारतीय विविध बंदरातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराचा असलेल्या तांबडा समुद्राला (रेड सी) मोठा वळसा घालून मालवाहू जहाजांना प्रवास करावा लागत असल्याने जहाजांच्या सर्व प्रकारच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सागरी मार्गावरील होणाऱ्या मालाच्या आयात-निर्यातीचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत घटले असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आशिया, आफ्रिका, युरोप खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराच्या तांबड्या समुद्रातून विविध देशांतील रोज शेकडो मालवाहू जहाजे विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करतात. मालवाहू जहाजांसाठी तांबडा समुद्र आयात-निर्यातीसाठी कमी अंतरामुळे अत्यंत उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो; मात्र या समुद्रातील जहाजांवर झालेल्या सागरी चाचांच्या  हल्ल्यांमुळे जहाज वाहतूक पुरती कोलमडली असून ठप्प झाली आहे. याचा विपरीत परिणाम या सागरी मार्गावरुन होणाऱ्या आयात-निर्यात करणाऱ्या मालवाहू जहाजांवर झाला आहे. 

धोका टाळण्यासाठी तांबड्या समुद्रातील प्रवास टाळून मालवाहू जहाजांना अन्य सागरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. इच्छित बंदरापर्यंत माल पोहोचविण्यासाठी २० ते ३० दिवसांपर्यंत विलंब होत आहे. वेळ, खर्च वाढला असल्यामुळे कंपन्यांनी जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये वाढ केली आहे.

मालवाहू जहाजांच्या भाडेदरांमध्ये केलेली दरवाढ नाईलाजाने करावी लागली असल्याचे शिपिंग कंपन्यांकडून सांगितले जात आहे; मात्र मालवाहू करणाऱ्या जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरात वाढ झाल्याने विविध बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे.-राहुल पवार, मालक, स्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट-इंपोर्ट कंपनी

रमजानमध्ये भारतीय बंदरांतून युरोप, अमेरिकेमध्ये विशेषतः महाराष्ट्रातून द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, आंबा आणि इतर विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात, मात्र या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.-इरफान मेनन, मालक बच्चूभाई ॲण्ड कंपनी

फळांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

अनेक निर्यातदार कंपन्यांनी आखाती देशांमध्ये वेळेवर फळे पोहोचविण्यासाठी विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे; मात्र मुबलक कार्गो स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमान कंपन्यांनीही दुपटीने दरवाढ केली असल्याचेही निर्यातदारांकडून सांगितले जात आहे. जहाजांना मार्ग बदलावा लागल्याने वाहतूक २० ते ३० दिवसांनी वाढली आहे. शेतीमाल वेळेत दाखल होत नसल्याने निर्यातदारांचे नुकसान होत आहे. तर निर्यातदारांनी फळांची खरेदीच कमी केल्याने निर्यात होणाऱ्या फळांचे दरही कमी होत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :uran-acउरण