शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

आविष्कार देसार्ई अलिबाग : बहुचर्चित असणारा रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार की रत्नागिरी जिल्ह्यात आल्या वाटेने पुन्हा परत जाणार या शक्यतेने मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाचे बस्तान बसले नाही तर रायगडच्या विकासाला खीळ बसणार आहेच शिवाय ‘व्हेंडर डेव्हलपमेंटवर’ विपरीत परिणाम होऊन आधीच हाताला तेल लावून बसलेल्या गुंतवणूकदारांसह काही राजकीय नेत्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे सध्या चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार अशी अटकळ लावली जात होती. त्यामुळे विविध गुंतवणूकदारांना या ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला. त्यानुसार या ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनी बऱ्यापैकी उसळी मारण्यास सुरुवात केली होती, मात्र याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्येच करावा अशी मागणी आता रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आणि काही राजकीय नेत्यांच्या चिंतेमध्ये भर घातली आहे.

हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आल्यास रायगडवासीयांना विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते प्रकल्पाच्या उद्घाटनाची फीत कापून झाल्यानंतर भरभराटीला येणाºया व्हेंडर डेव्हलपमेंटवर (विक्रेता विकास) विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. विक्रेता विकासाच्या साखळीमध्ये विविध कामगार, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरवणारे, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिक, मनुष्यबळ पुरवणारे, वकिली व्यवसाय करणारे, कर सल्लागार, हॉस्पिटल, छोटी-मोठी किराणा विक्रीची दुकाने अशा घटकांचा समावेश होतो. त्यामुळे यातील सर्वच उद्योग जन्माला येण्याआधीच भुईसपाट होणार असल्याने उद्योग जगतात चिंतेचे ढग दाटले आहेत.

प्रकल्प न आल्याने काही राजकीय नेत्यांना ठेके मिळणार नाहीत तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही त्यांना आता हात धुवून घेता येणार नाही. त्यामुळे हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले

प्रकल्प या ठिकाणी आला नाही तर गुंतवणूकदार आणि राजकीय नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार आहेच शिवाय प्रकल्पावर आधारित सर्व घटकांना फटका बसणार असल्याचे दिसून येते. प्रकल्प येण्याच्या शक्यतेने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांनी जमिनीची मोजणी, सातबारा उतारा, सर्च रिपोर्ट, जागेचे नकाशे याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. मात्र आता रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत जाणार या शक्यतेने सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या भारतातील तीन पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी अरेबियातील अरम्को कंपनी रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीचा सहभाग असल्याने स्वाभाविकच रायगड जिल्ह्यातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु लवकरच येथे नवीन प्रकल्प येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निराश होण्याचे अजिबात कारण नसल्याचे एका गुंतवणूकदार कंपनीच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडInvestmentगुंतवणूक