शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

आविष्कार देसार्ई अलिबाग : बहुचर्चित असणारा रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार की रत्नागिरी जिल्ह्यात आल्या वाटेने पुन्हा परत जाणार या शक्यतेने मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाचे बस्तान बसले नाही तर रायगडच्या विकासाला खीळ बसणार आहेच शिवाय ‘व्हेंडर डेव्हलपमेंटवर’ विपरीत परिणाम होऊन आधीच हाताला तेल लावून बसलेल्या गुंतवणूकदारांसह काही राजकीय नेत्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे सध्या चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार अशी अटकळ लावली जात होती. त्यामुळे विविध गुंतवणूकदारांना या ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला. त्यानुसार या ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनी बऱ्यापैकी उसळी मारण्यास सुरुवात केली होती, मात्र याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्येच करावा अशी मागणी आता रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आणि काही राजकीय नेत्यांच्या चिंतेमध्ये भर घातली आहे.

हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आल्यास रायगडवासीयांना विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते प्रकल्पाच्या उद्घाटनाची फीत कापून झाल्यानंतर भरभराटीला येणाºया व्हेंडर डेव्हलपमेंटवर (विक्रेता विकास) विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. विक्रेता विकासाच्या साखळीमध्ये विविध कामगार, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरवणारे, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिक, मनुष्यबळ पुरवणारे, वकिली व्यवसाय करणारे, कर सल्लागार, हॉस्पिटल, छोटी-मोठी किराणा विक्रीची दुकाने अशा घटकांचा समावेश होतो. त्यामुळे यातील सर्वच उद्योग जन्माला येण्याआधीच भुईसपाट होणार असल्याने उद्योग जगतात चिंतेचे ढग दाटले आहेत.

प्रकल्प न आल्याने काही राजकीय नेत्यांना ठेके मिळणार नाहीत तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही त्यांना आता हात धुवून घेता येणार नाही. त्यामुळे हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले

प्रकल्प या ठिकाणी आला नाही तर गुंतवणूकदार आणि राजकीय नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार आहेच शिवाय प्रकल्पावर आधारित सर्व घटकांना फटका बसणार असल्याचे दिसून येते. प्रकल्प येण्याच्या शक्यतेने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांनी जमिनीची मोजणी, सातबारा उतारा, सर्च रिपोर्ट, जागेचे नकाशे याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. मात्र आता रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत जाणार या शक्यतेने सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या भारतातील तीन पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी अरेबियातील अरम्को कंपनी रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीचा सहभाग असल्याने स्वाभाविकच रायगड जिल्ह्यातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु लवकरच येथे नवीन प्रकल्प येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निराश होण्याचे अजिबात कारण नसल्याचे एका गुंतवणूकदार कंपनीच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडInvestmentगुंतवणूक