शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

आविष्कार देसार्ई अलिबाग : बहुचर्चित असणारा रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार की रत्नागिरी जिल्ह्यात आल्या वाटेने पुन्हा परत जाणार या शक्यतेने मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाचे बस्तान बसले नाही तर रायगडच्या विकासाला खीळ बसणार आहेच शिवाय ‘व्हेंडर डेव्हलपमेंटवर’ विपरीत परिणाम होऊन आधीच हाताला तेल लावून बसलेल्या गुंतवणूकदारांसह काही राजकीय नेत्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे सध्या चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार अशी अटकळ लावली जात होती. त्यामुळे विविध गुंतवणूकदारांना या ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला. त्यानुसार या ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनी बऱ्यापैकी उसळी मारण्यास सुरुवात केली होती, मात्र याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्येच करावा अशी मागणी आता रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आणि काही राजकीय नेत्यांच्या चिंतेमध्ये भर घातली आहे.

हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आल्यास रायगडवासीयांना विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते प्रकल्पाच्या उद्घाटनाची फीत कापून झाल्यानंतर भरभराटीला येणाºया व्हेंडर डेव्हलपमेंटवर (विक्रेता विकास) विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. विक्रेता विकासाच्या साखळीमध्ये विविध कामगार, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरवणारे, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिक, मनुष्यबळ पुरवणारे, वकिली व्यवसाय करणारे, कर सल्लागार, हॉस्पिटल, छोटी-मोठी किराणा विक्रीची दुकाने अशा घटकांचा समावेश होतो. त्यामुळे यातील सर्वच उद्योग जन्माला येण्याआधीच भुईसपाट होणार असल्याने उद्योग जगतात चिंतेचे ढग दाटले आहेत.

प्रकल्प न आल्याने काही राजकीय नेत्यांना ठेके मिळणार नाहीत तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही त्यांना आता हात धुवून घेता येणार नाही. त्यामुळे हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले

प्रकल्प या ठिकाणी आला नाही तर गुंतवणूकदार आणि राजकीय नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार आहेच शिवाय प्रकल्पावर आधारित सर्व घटकांना फटका बसणार असल्याचे दिसून येते. प्रकल्प येण्याच्या शक्यतेने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांनी जमिनीची मोजणी, सातबारा उतारा, सर्च रिपोर्ट, जागेचे नकाशे याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. मात्र आता रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत जाणार या शक्यतेने सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या भारतातील तीन पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी अरेबियातील अरम्को कंपनी रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीचा सहभाग असल्याने स्वाभाविकच रायगड जिल्ह्यातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु लवकरच येथे नवीन प्रकल्प येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निराश होण्याचे अजिबात कारण नसल्याचे एका गुंतवणूकदार कंपनीच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडInvestmentगुंतवणूक