शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

कागदी लगद्याच्या गणेश मूर्त्यांच्या मागणीत वाढ परदेशातही मागणी वाढली

By निखिल म्हात्रे | Updated: September 3, 2023 18:10 IST

गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे.

अलिबाग - गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. तर, गणेशाच्या मूर्त्यांच्या सजावटीमध्ये देखील वाढ करण्याची मागणी करण्यात येत असून फेटेवाला, शाल आणि धोतर नेसलेल्या मूर्त्यांची मागणी देखील वाढली आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेशाच्या मुर्त्या बनविणाऱ्या कलाकारांची महानगरी मानली जाते. वर्षागणिक कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या तालुक्यात पेण शहर, हमरापूर, जोहे, तांबडशेत अशा अनेह गावात लाखो मुर्त्या तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, गेल्या काही वर्षात पीओपीच्या मूर्त्यांवर निर्बंध लावण्यात आल्याने या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला होता. तर, पेण येथील गणेशमुर्त्या या राज्यभरात पाठविण्यात येत असून परदेशातून देखील मोठी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, पेण येथील अनेक कारखान्यात यंदा शाडूच्या मातीच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींमध्ये वाढ झाली असल्याचे तरुण कारखानदार गणेश पवार याने म्हटले आहे. यामुळे, त्याने त्यांच्या कारखान्यात ५० टक्के पीओपी आणि शाडू मातीच्या गणपतींची निर्मिती केली असून कागदी लगद्याच्या मूर्त्यांची तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी, गणेश पवार यांच्या कारखान्यात सुमारे १५ हजार गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या तयार करण्यात आल्या असून अष्टविनायकाच्या रूपातील गणेश मूर्तीची मागणी असल्याचे सुरेखा पवार यांनी सांगितले आहे. तर, गणेश याच्या कारखान्यात त्यांचे पूर्ण कुटुंब हे मुर्त्या तयार करण्याच्या कामात दंगून गेले असून गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ते या व्यवसायात असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, यंदाच्या वर्षी अनेक भाविक आणि व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक आणि वजनाने हलक्या असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्त्यांची विशेष मागणी केली आहे. यामुळे, शाडूच्या मातीच्या मूर्त्यांच्या खर्चापेक्षा १० टक्के अधिक किंमत असलेल्या कागदी लगद्याच्या सुमारे एक हजार मुर्त्या तयार करण्यात आल्या असल्याचे अंकेश याने सांगितले आहे.

तर, यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त बालगणेश आणि मोत्याच्या रंगाचे गट्टू अशा नवीन मुर्त्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्या कारखान्यातून मुंबई, ठाणे, पुणे समवेत परदेशातील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथील मुर्त्या पाठविण्यात आला आहेत. तर, गणेश याच्या या कारखान्यात एक फुटापासून चार फुटांपर्यंत उंचीच्या मुर्त्या तयार करण्यात आल्या असून फेटेवाला, शाल परिधान केलेले आणि धोतर - पितांबर नेसलेल्या गणपतींची अधिक मागणी असल्याचे सोनाली पवार यांनी म्हटले आहे. यामुळे, या सजावटीचे काम हे कारखान्यातील महिलावर्ग करीत असल्याचे सांगण्यात आले असून उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवानिमित्त अनेक भाविक हे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यात प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

वजनाने हलक्या असलेल्या कागदी लगद्याच्या मुर्त्या या विसर्जनाला देखील सोयीस्कर असल्याने अनेक भाविक या मूर्त्यांची मागणी करीत आहेत. तर, परदेशात देखील या कागदी लगद्याच्या मूर्त्यांची मागणी वाढली असल्याचे गणेश कला केंद्राच्या गणेश पवार याने म्हटले आहे. तर, यंदाच्या उत्सवानिमित्त पेण तालुक्यात विविध रूपातील सुमारे ३० लाख गणेशमूर्त्या तयार करण्यात आल्या असून यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलिबाग