शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नेरळ-दहिवली पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:55 IST

दरवर्षी पुलावरून जाते पाणी : अनेक गावांचा तुटतो संपर्क

नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्वाच्या नेरळ -कळंब जिल्हा मार्गावरील दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पुराचे पाणी जाऊन रस्ता बंद होतो. सुमारे ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो, तसेच पुलावरील रस्त्याची आणि लोखंडी काठड्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी तसेच वाहन चालकांकडून केली जात आहे.या पुलासंदर्भात स्थानिकांची मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाकडून दरवर्षी पुलाची उंची वाढविण्या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो, मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी या पुलाची दुर्दशा होत असते. तसेच पूल पाण्याखाली गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो. याचा मोठ्या प्रमाणात त्रास स्थानिक नागरिक, प्रवासी आणि आजूबाजूच्या नोकरदार, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वी या पुलाच्या खांबांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पुन्हा या पुलाला तडा गेल्याने पुन्हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे शासनाने परिसरातील गावांचा विचार करून तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.दहिवली पूल गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला आहे. उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जाऊन पुलाची आणि रस्त्याची दुर्दशा होत आहे; त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने जास्त उंचीच्या पुलाची नव्याने उभारणी करावी.- चिंधु तरे,सरपंच,दहिवली ग्रामपंचायतनेरळ- दहिवली पुलावरून दरवर्षी पावसाचे पाणी जाऊन रस्ता खराब होतो, आणि रेलिंग तुटतात. या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात काळवितो.- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस