शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नेरळ-दहिवली पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:55 IST

दरवर्षी पुलावरून जाते पाणी : अनेक गावांचा तुटतो संपर्क

नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्वाच्या नेरळ -कळंब जिल्हा मार्गावरील दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पुराचे पाणी जाऊन रस्ता बंद होतो. सुमारे ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो, तसेच पुलावरील रस्त्याची आणि लोखंडी काठड्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवाशी तसेच वाहन चालकांकडून केली जात आहे.या पुलासंदर्भात स्थानिकांची मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाकडून दरवर्षी पुलाची उंची वाढविण्या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जातो, मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी या पुलाची दुर्दशा होत असते. तसेच पूल पाण्याखाली गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो. याचा मोठ्या प्रमाणात त्रास स्थानिक नागरिक, प्रवासी आणि आजूबाजूच्या नोकरदार, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वी या पुलाच्या खांबांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पुन्हा या पुलाला तडा गेल्याने पुन्हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे शासनाने परिसरातील गावांचा विचार करून तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.दहिवली पूल गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला आहे. उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जाऊन पुलाची आणि रस्त्याची दुर्दशा होत आहे; त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने जास्त उंचीच्या पुलाची नव्याने उभारणी करावी.- चिंधु तरे,सरपंच,दहिवली ग्रामपंचायतनेरळ- दहिवली पुलावरून दरवर्षी पावसाचे पाणी जाऊन रस्ता खराब होतो, आणि रेलिंग तुटतात. या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात काळवितो.- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस