शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता व मॉनिटरिंग स्टेशन केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 19:29 IST

बंदर क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्तेचे नियमन करण्यात होणार मोलाची मदत

मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता केंद्र,  मॉनिटरिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिक पर्यावरण निरीक्षण वाहनाचे उद्घाटन अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी ( २१) करण्यात आले. सागरी जल गुणवत्ता केंद्र,मॉनिटरिंग स्टेशन प्रणालीमुळे जेएनपीए बंदर परिसरातील पाण्याची गुणवत्ता, इलेक्ट्रिक मॉनिटरिंग वाहन बंदर क्षेत्रातील सागरी पाणी आणि हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी बंदर क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्तेचे नियमन करण्यात मोलाची मदत होणार आहे. तापमान, पीएच, विरघळलेला ऑक्सिजन, अमोनिया, चालकता, नायट्रेट, क्षारता यासारख्या पाण्याच्या गुणवत्तेच्या स्टेशनच्या डेटाद्वारे बंदर इस्टेटच्या आसपासच्या पर्यावरणीय गुणवत्तेचे पालन तपासण्या व्यतिरिक्त जेएनपीए वाहनांच्या ग्रीनहाऊस गॅस फूटप्रिंट कमी करण्यास सक्षम ठरणार आहे. तसेच गढूळपणा आणि सागरी पाण्याची टीडीएस, गुणवत्तेचा डेटाबेस, सागरी वातावरणातील स्वच्छता आदी मानके राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

ई-वाहन येथे सुरू असलेल्या सभोवतालची हवा आणि ध्वनी निरीक्षणासाठी मदतगार साबित होणार आहे.तसेच मरीन वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन आणि ई-वाहनांचे लाँचिंग हे शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष संजय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे. या आयोजित उद्घाटन प्रसंगी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, जेएनपीएचे सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जेएनपीएने आयआयटी  मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या सहकार्याने सागरी जल गुणवत्ता देखरेख केंद्र, इलेक्ट्रिक पर्यावरण निरीक्षण केंद्र विकसित केले आहे. त्याशिवाय विविध पर्यावरणीय सुधारणा आणि ग्रीन पोर्ट उपक्रमही सुरू केले आहेत. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, बंदर परिसरात आणि टाउनशिपमध्ये बदललेले एलईडी दिवे,ई आरटीजीसीएस, किनाऱ्यावरील वीज पुरवठा, पुनरुत्थान  शेवा मंदिर आणि शेवा पायथ्याजवळील जलकुंभ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे वाहतूक सुलभतेसाठी पुढाकार, खारफुटीचे व्यवस्थापन, तेल गळती प्रतिसाद इत्यादीसह पोर्ट ग्रीन कव्हर आदी बाबीं बरोबरच ४.१० एमडब्लूपी क्षमतेचे सौर पॅनेलही  स्थापित केले आहेत.यामुळे सरासरी ३८ %  उर्जेची आवश्यकता अक्षय ऊर्जेसाठी होते आहे. उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी बंदर परिसरात एलईडी दिवेही देखील स्विच करण्यात आले आहेत.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड