शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी; सुरक्षेवर भर

By निखिल म्हात्रे | Updated: December 25, 2022 13:01 IST

अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.

अलिबाग : ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन केद्रांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. या संधीचा फायदा घेऊन हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रायगड मधील अलिबाग, मुरुड, काशिद, किहीम, हरीहरेश्वर, माथेरान, कर्नाळा अभयारण्य अशा आदी ठिकाणी पर्यटक दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरुड परीसरात गेल्या चार दिवसात 50 ते 70 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुटीपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सध्या थंडीचा मोसम आणि सलग सुटय़ा असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झालेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आलेत. हॉटेल, लॉजिंगचा व्यवसायही तेजीत आहे. घोडागाडीवाले, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स यांचा व्यवसाय करणारे खूश आहेत. इथल्या लॉजेसनाही चांगला व्यवसाय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे.

किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ला, महड, पाली येथील अष्टविनायकांची मंदिरे, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिराचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. रायगडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आताच्या मोसमात पर्यटकांचा हा ओघ नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहणार आहे. नाताळच्या सुट्टीमुळे व पुढे चार दिवसांनी थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठीया ठिकाणांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिस्को, डिस्कोथेकची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी समुद्र किनाऱ्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर पोलिस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. महत्वाच्या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.

जिल्ह्यात आज पासून साधारणत: 7 दिवस वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान पर्यटकांना वाहतूकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आली असून पोलिस यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तर बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :tourismपर्यटन