शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे तीन हजार अंगणवाड्यांना कुलूप

By निखिल म्हात्रे | Updated: January 11, 2024 17:47 IST

जिल्ह्यातील ६२ हजार बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर.

निखिल म्हात्रे, अलिबाग : अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला एक महिना उलटून गेला आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाड्या बंद असल्याने ६२ हजारांहून अधिक बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरात ६० हून अधिक असणाऱ्या कुपोषित बालकांच्या आहाराबाबत कोणतीही हेळसांड होत नसून त्यांना महिला बचत गटाकडून आहार देण्याचे काम सुरू असल्याचा दावा महिला बालकल्याण विभागाने केला आहे.

अंगणवाडी परिसरात शुकशुकाट:

सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. भरीव मानधन जाहीर करावे. सामाजिक सुरक्षा मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवार ४ डिसेंबर २०२३ पासून संप सुरू केला आहे. ३८ दिवस उलटूनही संप सुरूच आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील मुलांचा किलबिलाट थंडावला आहे. 

गजबजणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये महिनाभरापासून शुकशुकाट आहे. त्यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाबरोबरच बौद्धिक व शारीरिक विकासावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

विविध शासकीय कामे रखडली :

अंगणवाडी सेविकांमार्फत होणाऱ्या गृहभेटी, लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाइन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे रखडली आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत सरकारने कोणतीही भूमिका न घेतल्याने त्या अजूनपर्यंत दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.

संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्र:

तुटपुंज्या मानधनामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून लढा सुरू केला आहे. या संपाला ३८ दिवस झाले आहेत. अंगणवाडी सेविकादेखील त्यांच्या ठाम भूमिकेवर आहेत. संप मोडीत काढण्यासाठी अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजाविल्या आहेत. काहींना कामावर हजर न राहिल्यास काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे संप मोडीत काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात ३ हजार ९८ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ८०० अंगणवाड्या सुरू आहेत. त्यात खालापूर, उरण, माणगाव, तळा व काही प्रमाणात अलिबाग तालुक्यातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प विभागामार्फत नोटिसा बजाविल्या आहेत- निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

टॅग्स :alibaugअलिबागStrikeसंप