शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

दुपारी असह्य झळा, रात्र थंडा थंडा कूल; रायगडमध्ये बदलत्या वातावरणाचा अनुभव

By निखिल म्हात्रे | Updated: April 12, 2024 17:12 IST

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

निखिल म्हात्रे, अलिबाग : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर, संध्याकाळी तो २६ पर्यंत खाली येत असल्याने असह्य उकाडा आणि गारवा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव येथे येत आहे. गुरुवारनंतर तापमानाचा पारा आणखी पाच ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.

गुलाबी थंडीचा आनंद लुटल्यानंतर रायगडकर आता उन्हाच्या झळांनी घामाघूम होऊ लागले आहेत. शुक्रवारी कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी नागरिक थंड पेयांना पसंती देत आहेत.

रायगडात गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होऊ लागला आहे. याचा परिणाम तापमानावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान आता ३३ अंशांवर जाऊ लागले आहे, असे जाणकार सांगतात. 

मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. पण, काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माठांची मागणी वाढली आहे. यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट आहेत. - दीपक पाटील, माठ विक्रेता

उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली आहे. मात्र, थंड पदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारण ठरू शकतात.- डाॅ. विनित शिंदे

टॅग्स :alibaugअलिबागTemperatureतापमान