शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

शिवशाही एसटी सेवा अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:32 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे.

अलिबाग : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. अलिबाग-मुंबई मार्गावर धावणाºया शिवशाही वातानुकूलित एसटी बसचा शुभारंभ गुरु वारीअ‍ॅड. पाटील यांच्या हस्ते अलिबाग एसटी बस आगारात करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.यापूर्वी मुंबई आगाराची शिवशाही बस प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू होती. आता अलिबाग आगारास शिवशाही बस मिळाल्याने आता अलिबाग-मुंबई मार्गावर ही शिवशाही बस कायमस्वरूपी चालणार असल्याचे अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव यांनी सांगितले. शिवशाही बसचे अलिबाग-मुंबई प्रवासी भाडे प्रौढांसाठी १७० रु पये व लहानांसाठी ८६ रु पये असून, एसटीच्या कोणत्याही सवलती या बसला लागू राहाणार नाहीत.पिंपळभाट, कार्लेखिंड, तीनविरा, पेझारी, पोयनाड, पेण असे थांबे असणारी ही बस अलिबाग आगारातून मुंबईकरिता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता सुटेल, तर मुंबई सेंटर येथून ही बस सकाळी १०.३० वाजता व संध्याकाळी ६.४५ वाजता सुटणार असल्याचे यादव यांनी सांगितले.या वेळी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव, वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर्स आॅफ कोकण संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोग, चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य अजित माळी, वडगावचे सरपंच जयेंद्र भगत, एम. डी. मगर, ए. पी. अवतार, विजय म्हात्रे, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.>अलिबाग- पुणे बसची मागणीअलिबाग-पुणे मार्गावर अशाच प्रकारे शिवशाही बसच्या गरजेबाबत या वेळी चर्चा झाली. अलिबाग-पुणे मार्गावर ही बस सुरू केल्यास शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून अलिबागेत येऊ इच्छिणाºया पर्यटकांकरिता सकाळच्या वेळेत पुण्याहून सोडल्यास ती सोईची होईल व नफ्यात चालेल. तर संध्याकाळी अलिबागहून बस सोडल्यास अलिबागेतून पुण्यास व पुण्याहून पुढे जाऊ इच्छिणाºया प्रवाशांकरिता ती अत्यंत सोईची ठरेल. या चर्चेला गांभीर्याने विचारात घेऊन ही बस सुरू करण्याबाबत आपण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. अलिबाग सावंतवाडी व रत्नागिरी या दोन बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी दिलीप जोग यांनी केली.