शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिवशाही एसटी सेवा अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:32 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे.

अलिबाग : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. अलिबाग-मुंबई मार्गावर धावणाºया शिवशाही वातानुकूलित एसटी बसचा शुभारंभ गुरु वारीअ‍ॅड. पाटील यांच्या हस्ते अलिबाग एसटी बस आगारात करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.यापूर्वी मुंबई आगाराची शिवशाही बस प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू होती. आता अलिबाग आगारास शिवशाही बस मिळाल्याने आता अलिबाग-मुंबई मार्गावर ही शिवशाही बस कायमस्वरूपी चालणार असल्याचे अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव यांनी सांगितले. शिवशाही बसचे अलिबाग-मुंबई प्रवासी भाडे प्रौढांसाठी १७० रु पये व लहानांसाठी ८६ रु पये असून, एसटीच्या कोणत्याही सवलती या बसला लागू राहाणार नाहीत.पिंपळभाट, कार्लेखिंड, तीनविरा, पेझारी, पोयनाड, पेण असे थांबे असणारी ही बस अलिबाग आगारातून मुंबईकरिता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता सुटेल, तर मुंबई सेंटर येथून ही बस सकाळी १०.३० वाजता व संध्याकाळी ६.४५ वाजता सुटणार असल्याचे यादव यांनी सांगितले.या वेळी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव, वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर्स आॅफ कोकण संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोग, चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य अजित माळी, वडगावचे सरपंच जयेंद्र भगत, एम. डी. मगर, ए. पी. अवतार, विजय म्हात्रे, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.>अलिबाग- पुणे बसची मागणीअलिबाग-पुणे मार्गावर अशाच प्रकारे शिवशाही बसच्या गरजेबाबत या वेळी चर्चा झाली. अलिबाग-पुणे मार्गावर ही बस सुरू केल्यास शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून अलिबागेत येऊ इच्छिणाºया पर्यटकांकरिता सकाळच्या वेळेत पुण्याहून सोडल्यास ती सोईची होईल व नफ्यात चालेल. तर संध्याकाळी अलिबागहून बस सोडल्यास अलिबागेतून पुण्यास व पुण्याहून पुढे जाऊ इच्छिणाºया प्रवाशांकरिता ती अत्यंत सोईची ठरेल. या चर्चेला गांभीर्याने विचारात घेऊन ही बस सुरू करण्याबाबत आपण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. अलिबाग सावंतवाडी व रत्नागिरी या दोन बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी दिलीप जोग यांनी केली.