शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; जि.प.मुख्याधिकाऱ्यांनी १० मे रोजी केले बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:05 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचा-यांचे पगार गेले काही महिने सातत्याने किमान एक महिन्याच्या विलंबाने होत आहेत.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचा-यांचे पगार गेले काही महिने सातत्याने किमान एक महिन्याच्या विलंबाने होत आहेत. सद्यस्थितीत एप्रिल व मे अशा दोन महिन्यांचे पगार अद्याप झाले नसल्याने, आपल्या पगाराच्या माध्यमातून घरांकरिता कर्ज घेतलेल्या अधिकारी व कर्मचाºयांचे बँकांचे हप्ते थकल्याने, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई हे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली असून याबाबतचे तक्रार निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना गुरुवारी दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.दरम्यान, या गंभीर समस्येबाबत आरोग्य कर्मचाºयांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून आपले गाºहाणे सांगितले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह संयुक्त बैठक घेवून याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे तटकरे यांनी सांगितले होते. तर या गंभीर परिस्थिती दूर करुन आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लागावे या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव काही बदल १० मे २०१९ रोजी केले. त्यानुसार आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग-२ चे पद रिक्त असल्याने आहरण व संवितरणाचे अधिकार अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शैलेश घालवाडकर यांच्याकडे देण्यात आले होते. ते काढून सहाय्यक प्रशासन अधिकारी बाबासाहेब देसाई यांच्याकडे देण्यात आले आहेत.दोन महिन्याचे पगार झाले नसल्याने संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठा असंतोष निर्माण झाला असून, त्याचा विपरित परिणाम जनसामान्यांना सुकर आरोग्य सेवा मिळण्यावर होत आहे. पगार झाले नसल्याने कौटुंबिक पातळीवर निर्माण झालेल्या संघर्षाचा परिणाम आरोग्य कर्मचाºयावर होवून तो १०० टक्के मानसिकतेने काम करु शकत नसल्याची माहिती जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाºयांशी संपर्क साधला असता प्राप्त झाली. अलिबागमधील जिल्हा सरकारी रुग्णालयास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी अचानक भेट दिल्याने समोर आलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची ढासळती आरोग्य सेवा वेळीच सावरणे अनिवार्य असल्याची माहिती काही डॉक्टरांनी दिली आहे.तक्रार निवेदनातील बारा मागण्या- गुरुवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना दिलेल्या तक्रार निवेदनात एकूण बारा मागण्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांचे वेतन नियमित होत नाही त्याबाबत कार्यवाही करावी, आश्वसित प्रगती योजना (१२ व २४ वर्षे) प्रस्ताव त्वरित व्हावेत, कालबध्द व नियमित पदोन्नती होणे व सेवा खंड समाप्ती होणेबाबत कार्यवाही, प्रत्येक प्रा. आ. केंद्राच्या ठिकाणी कनिष्ठ लिपीक रिक्त पदे भरणे , आरोग्य विभागातील सहा. प्रशासन अधिकारी माणिकदास दळवी यांच्याकडून आरोग्य कर्मचाºयांची पिळवणूक होते तसेच त्यांना आरोग्य विभागामध्ये पाच वर्षे झालेली असल्याने त्यांची आरोग्य विभागामधून त्वरित बदली करण्यात यावी,सुधारित ७ वा वेतन आयोगाच्या शासन निर्णयाप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे, अपंग कर्मचारी वर्गास पदोन्नत्ती अद्याप देण्यात आलेली नाही ती देण्यात यावी, रजा रोखीकरण/वैद्यकीय देयक/ अ-प्रमाणपत्र/ परीक्षाधीन कालावधी प्रकरणे मंजूर करण्यास होणारा विलंब थांबवावा, आरोग्य विभागाकडील आंतर जिल्हा बदलीबाबत प्रस्तावावरील कार्यवाहीस मोठा विलंब झाला असून त्यावर कार्यवाही करण्यात यावी, माहे एप्रिल व मे २०१९ चे वेतन अद्याप करण्यात आलेले नाही. पगार देयकाकडे दुर्लक्ष होत आहे, त्याबाबत सत्वर कार्यवाही करावी,आरोग्य कर्मचाºयांचे पदोन्नती स्थगितीबाबत शासन निर्णय प्रमाणे सन २०१८ च्या आधीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याबाबत कार्यवाही व्हावी अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

टॅग्स :Healthआरोग्य